जनशताब्दी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेस या कोकणवासीयांच्या हक्काच्या गाड्या आहेत.
मुंबई- जनशताब्दी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेस या कोकणवासीयांच्या हक्काच्या गाड्या आहेत. या गाड्यांचे डबे कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. अखेर या एक्स्प्रेसचे प्रत्येकी पाच डबे वाढवण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या १७ डब्यांच्या होणार असून अधिक प्रवासी त्यातून प्रवास करू शकतील.
दादर ते सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेस आणि सीएसटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या कोकणावासीयांच्या गाड्या आहेत. या गाड्या १२ डब्यांच्या असल्याने प्रवाशांचे हाल होतात. मध्य रेल्वेने दोन्ही गाड्यांना पाच-पाच डबे वाढवण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली होती. हा प्रस्ताव बोर्डाने मंजूर केला. पाच डबे जनशताब्दीसाठी तर पाच डबे हे राज्यराणी एक्स्प्रेससाठी वापरले जातील. महिन्याभरात जनशताब्दीचे पाच डबे मध्य रेल्वेला मिळतील तर राज्यराणीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
कोकणकन्या वर्षभर ‘फुल्ल’ असल्याने प्रवाशांना राज्यराणी एक्स्प्रेसचा दिलासा मिळाला. ही गाडी १२ डब्यांची असल्याने ती कायम ‘फुल्ल’ होऊ लागल्याने वाढीव डब्याची मागणी प्रवासी करीत होते. जनशताब्दी दुपारपर्यंत सिंधुदुर्गात पोहोचत असल्याने प्रवाशांची ही आवडती गाडी आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी होत होती.
खुप आनंदाची बातमी आहे.
रत्नागिरी प्यासेंजर रात्री सोडली तर कोकणकन्या आणि राज्यराणी वरचा भार हलका होईल.
Very Nice………………………………Jai Konkan…