या महामार्गावर पुरेशा उंचीचे दुभाजक नाहीत, तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्येही उणिवा आहेत.
पुणे- द्रुतगती महामार्गावरील सुरक्षितता हा मोठा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. या महामार्गावर दुभाजक नसल्याने, तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्यामुळेच अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे, असे स्पष्टीकरण गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. या महामार्गावरील सुरक्षिततेसंदर्भात वेळोवेळी राज्य रस्ते विकास महामंडळाला कळवले असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली.
द्रुतगती महामार्गावर सोमवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री पाटील यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. महामार्ग पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ आणि पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक विजय मगर यांच्याकडून त्यांनी अपघातांमागील कारणे समजावून घेतली. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर तातडीने जादा उंचीचे रस्ता दुभाजक बांधण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या महामार्गावर पुरेशा उंचीचे दुभाजक नाहीत, तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्येही उणिवा आहेत. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळेच अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महामार्गावरील सुरक्षिततेसंदर्भात वेळोवेळी राज्य रस्ते विकास महामंडळाला कळवूनही अद्याप कार्यवाही झाली नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
Yo, good looikn out! Gonna make it work now.