ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने काय भूमिका घ्यावी, याबाबत मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
ठाणे- ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने काय भूमिका घ्यावी, याबाबत मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
यावेळी बहुतांशी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सूर लावला. यानंतर याबाबत पक्ष लवकरच आपली भूमिका जाहीर करेल, असे नारायण राणे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्याची जबाबदारी घेतल्यानंतर राणे यांनी मंगळवारी सर्वप्रथम ठाणे येथे सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असावी? याबाबत हा मेळावा घेण्यात आला.
यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राणे यांनी ठाण्याची जबाबदारी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या मेळाव्यात राष्ट्रवादीला मदत करायची की नाही? याबाबत मतप्रदर्शन करताना बहुतांशी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार वसंत डावखरे यांच्याबाबत मात्र सर्वानीच चांगले मत मांडले.
मात्र डावखरे हे पक्ष न पाहता प्रत्येकाला मदत करतात, हे जरी खरे असले, तरीही आता काँग्रेसने पक्षहिताची भूमिका घ्यावी, असा मतप्रवाह यावेळी समोर आला. शिवाय राष्ट्रवादीला जर काँग्रेसने आत्ता मदत केली, तर भविष्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला कोकण पदवीधर मतदारसंघ सोडावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असून राज्यपातळीवर लवकरच याबाबत निर्णय घेऊन तो जाहीर करू, असे नारायण राणे यांनी सांगितले.
निरंजन डावखरेंनी घेतली ‘सदिच्छा’ भेट
दरम्यान, या मेळाव्यानंतर राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार वसंत डावखरे यांचे सुपुत्र आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी १५ मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर निरंजन डावखरे यांना याबाबत विचारले असता आपण राणेसाहेबांची ‘सदिच्छा’ भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नमस्कार
शुभ प्रभात
ठाण्यासाठी राष्ट्रवादई कॉंग्रेस वर विस्वास न ठेवता कॉंग्रेस दादांच्या नेतृत्वआ खाली स्वतंत्र आहे असे आव्हाहन सर्व जनतेला करणे हि आजच्या काळाची गरज आहे. दोन्ही पक्षांची स्वतंत्र भूमिका हि दादांच्या ठाण्याच्या यशश्वी पर्वाची सुरुवात असेल ठाण्यातील जनता दादांना नक्की प्रतिसाद देईल.
निलेश आणी नितेश यांनी कृपा करून कुठलेही निर्णय सय्यमतेणे घ्यावेत.
त्यामुळे दादांची प्रतिमा जनतेत वाढेल.
कोकणाला तुमची नितांत गरज आहे.