मालाडच्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीत विषारी दारु प्राशन केल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई – मालाडच्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीत विषारी दारु प्राशन केल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी उपचारा दरम्यान १३ जणांचा मृत्यू झाला होता.
मालाडच्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीत रहाणारे अनेक जण बुधवारी रात्री देशी दारू प्याले होते. यातील अनेकांना गुरुवारी सकाळी उलटय़ा-अतिसार आणि मळमळणे असा त्रास सुरु झाला. त्यानंतर काहींना मालाडच्या सुराणा तर काहींना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील तेरा जणांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.
अजूनही काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. राजू हनुमंता पासकर (५०), डोनाल्ड रॉबर्ट पटेल (४७) आणि गौतम हारते (३०) अशी तिघांची नावे आहेत. ३०४, ३२८ आणि ३४ या कलमांखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी दोन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
खूप मोट्ट काम केले मुख्य मंत्री साहेबांनी ,!!!