मुंबई – बुरखा आणि हिजाब परिधान करण्याच्या सक्तीमुळे भारताची अव्वल बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन हिने इराणमध्ये होणा-या आशियाई नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली आहे. बुरखा आणि हिजाब परिधान करण्याची सक्ती म्हणजे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे तिने म्हटले आहे.
‘‘आगामी आशियाई नेशन्स कप बुद्धिबळ २०१८ स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याबद्दल मी भारतीय महिला संघाची माफी मागते. या स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूंनी डोक्यावर स्कार्फ बांधणे बंधनकारक आहे. स्कार्फ किंवा बुरखा परिधान करण्यासाठी सक्ती केली जाऊ नये, असे मला वाटते. इराणमध्ये लागू असलेले हे नियम मानवाधिकाराविरोधात विशेषत: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य तसेच माझ्या धर्माच्या विरोधात आहे.
मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठी मी इराणमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होत नसल्याने दु:ख आहे. खेळाडू म्हणून मी खेळासाठी कोणतीही तडजोड केली जाते. पण काही गोष्टींमध्ये तडजोड होऊ शकत नाही,’’ अशा शब्दांत सौम्या हिने तिची भूमिका मांडली आहे.
आशियाई नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा २६ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८ या कालावधीमध्ये इराणमध्ये होणार आहे. या स्पर्धेत महिला खेळाडूंना डोक्यावर स्कार्फ घेणे बंधनकारक असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
कौतुक आणि अभिनंदन ,
काही गोष्टींमध्ये तडजोड होऊ शकत नाही आणि धर्मा बद्दल तर नाहीच नाही.
Where r so called secular people ?
Why not protest against Iran for this kind of compulsion.