दादरच्या कमला मेहता अंधांच्या शाळेतील मुलांनी साजरी केलेली पाण्याविना रंगपंचमी पाहून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच वाटू लागले. अंध मुलानाही सामाजिक स्थितीची जान असलेली पाहून क्षणभर आपण डोळे असून अंध असल्यासारखे वागतो ह्याचे वैषम्य वाटले. ह्या मुलांकडून सामान्यांनी शिकण्यासारखे बरेच काही आहे असे मनोमन वाटते. एवढा सगळा दुष्काळ पडलेला असतानासुद्धा काही ठिकाणी पाण्याची नासाडी करण्यात आली, हे पाहून व वाचून मन दु:खी झाले. ह्याचे बोलके उदाहरण म्हणजे काही संत महात्मे म्हन्विनार्र्या मंदिलिनी केलेला पाण्याचा अपव्यय. तिकडे लोक पाण्याविना दिवस काढताहेत आणि आम्ही मंडळी धुळवड तीही पाण्याने साजरी करतोय, किती खेदाची गोष्ठ हि. वर आणि म्हणतात कसे, मी पाउस पडू शकतो. अरे! त्यासाठी हि तोंडाची पोपटपंची कशाला? पाउस पडून दाखव कि. दुष्काळग्रस्त तुम्हाला दुवा देतील. हे न करता, फक्त तोंडाच्या वाफाच घालवायच्या. हे योग्य नव्हे. जखमेवर मीठ चोळून, किंवा आगीत तेल ओतून दुष्काळ जाणार नाही. त्यासाठी ठोस आस्व कार्यक्रम राबवावे लागतील.
दादरच्या कमला मेहता अंधांच्या शाळेतील मुलांनी साजरी केलेली पाण्याविना रंगपंचमी पाहून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच वाटू लागले. अंध मुलानाही सामाजिक स्थितीची जान असलेली पाहून क्षणभर आपण डोळे असून अंध असल्यासारखे वागतो ह्याचे वैषम्य वाटले. ह्या मुलांकडून सामान्यांनी शिकण्यासारखे बरेच काही आहे असे मनोमन वाटते. एवढा सगळा दुष्काळ पडलेला असतानासुद्धा काही ठिकाणी पाण्याची नासाडी करण्यात आली, हे पाहून व वाचून मन दु:खी झाले. ह्याचे बोलके उदाहरण म्हणजे काही संत महात्मे म्हन्विनार्र्या मंदिलिनी केलेला पाण्याचा अपव्यय. तिकडे लोक पाण्याविना दिवस काढताहेत आणि आम्ही मंडळी धुळवड तीही पाण्याने साजरी करतोय, किती खेदाची गोष्ठ हि. वर आणि म्हणतात कसे, मी पाउस पडू शकतो. अरे! त्यासाठी हि तोंडाची पोपटपंची कशाला? पाउस पडून दाखव कि. दुष्काळग्रस्त तुम्हाला दुवा देतील. हे न करता, फक्त तोंडाच्या वाफाच घालवायच्या. हे योग्य नव्हे. जखमेवर मीठ चोळून, किंवा आगीत तेल ओतून दुष्काळ जाणार नाही. त्यासाठी ठोस आस्व कार्यक्रम राबवावे लागतील.