महात्मा गांधी जयंतीला दरवर्षी सर्व सरकारी कार्यालयांना रजा असते. मात्र…
नवी दिल्ली- महात्मा गांधी जयंतीला दरवर्षी सर्व सरकारी कार्यालयांना रजा असते. मात्र यंदा केंद्र सरकारने ही रजा रद्द केली असून सरकारी कर्मचा-यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणा-या ‘स्वच्छ भारत’अभियानाची प्रतिज्ञा सर्व कर्मचा-यांना देण्यात येणार आहे.
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सुट्टी असते. मात्र, यंदा २ ऑक्टोबरला सरकारी कार्यालय, सार्वजनिक कार्यक्रमात ‘स्वच्छ शपथ’ घ्यावी लागणार आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी सर्व केंद्रीय सरकारी सचिवालयांना दिले आहेत.
या राष्ट्रीय अभियानामध्ये प्रत्येक खात्याने सहभाग घ्यायचा आहे. संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाईल. सरकारी कार्यालय आणि परिसरातील कचरा हटवण्यात येणार आहे.
चला आपल्या भारताची अंतर्बाह्य स्वच्छता करू या ,,,,,,,,,,,,,,,आणि मा. मोदी साहेबांच्या पावन प्रयात्नाना आणखी मोठे यश देऊ या,,,,,,,,,,,,,,,