पती-पत्नीच्या वादात एका निर्दयी मातेने आपल्या १३ वर्षीय मुलाला बॅटने मारहाण करुन त्याची हत्या केली.
पुणे- पती-पत्नीच्या वादात एका निर्दयी मातेने आपल्या १३ वर्षीय मुलाला बॅटने मारहाण करुन त्याची हत्या केली. पुण्यातील टिंगरेनगर भागात ही घटना घडली आहे.
राखी गालपांडे (३६) असे या निर्दयी मातेचे नाव आहे. राखी गालपांडेचा पतीशी वाद सुरु होता. त्या दोघांमध्ये घटस्फोट प्रकरणी न्यायालयात खटला चालू आहे. राखी गालपांडे एका खाजगी कंपनीत एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. तर तिचा पती नागपूरमध्ये राहतो.
त्यांचा मुलगा चैतन्य तरुण गालपांडे हा आईसोबतच पुण्यात राहत होता. मात्र मुलगा कोणाकडे राहणार यावरुन पती-पत्नीमध्ये वाद होत असे. यातच मुलगा चैतन्य याने वडिलांकडे राहण्याचा हट्ट धरला.
त्यामुळे नव-यासोबतच्या भांडणाचा राग तिने मुलावर काढत त्याला बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात घाव झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून राखी गालपांडेला पोलिसांनी अटक केली आहे.
ह्या aslya nirdai maatela??? फाशी vhailaach havi,