जैन धर्माचे पर्युषण पर्व १० ते १७ पर्यंत असल्यामुळे या काळात मुंबईतील मांस मटणाची दुकाने बंद ठेवण्याची मागणी विश्वमैत्री ट्रस्टच्या माध्यमातून भाजपाच्या नेत्यांनी केली आहे.
मुंबई- जैन धर्माचे पर्युषण पर्व १० ते १७ पर्यंत असल्यामुळे या काळात मुंबईतील मांस मटणाची दुकाने बंद ठेवण्याची मागणी विश्वमैत्री ट्रस्टच्या माध्यमातून भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांनी चार दिवसांची बंदी घातल्यामुळे कत्तलखानेच नाही तर मांस विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मांसहारी लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
भाजपाचे नेते आमदार राज पुरोहित आणि अतुल भातखळकर यांनी ‘विश्वमैत्री ट्रस्ट’ व ‘अहिंसा संघ’ या संस्थांच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन पर्युषण पर्वात सर्व कत्तलखाने व मांस मटणाची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली होती. या आठ दिवसांमध्ये ही बंदी जाहीर करावी आणि या कालावधीत जे कत्तलखाने व मांस मटणाची दुकाने सुरू राहतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
या पत्राच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २८ ऑगस्ट रोजी एका परिपत्रकाद्वारे आदेश जारी करून १०, १३, १७ आणि १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये देवनार पशुवधनगृहाच्या बाहेर महापालिका बाजार व मांस दुकानातून मांस विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले आहे. तर एकनाथ खडसे यांनी महापालिकेकडे बोट दाखवत सारवासारव केली.
ह्यालाच म्हणतात राम राज्य.जय श्री राम