एकबाजूला रस्ते साफ करायचे आणि दुस-याबाजूला व्देषाला खतपाणी घालायचे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर जोरदार टिका केली.
नवी दिल्ली – भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताची उदारमतवादी प्रतिमा जगात निर्माण केली होती. या प्रतिमेला तडा देण्याचे काम काही शक्तींकडून देशात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात धर्माधतेचे विष पेरत आहेत, अशी खरमरीत टीका कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी गुरुवारी केली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसतर्फे केले होते. या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मोदी यांचे नाव न घेता सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.
सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच देशाला प्रेमाचा, एकतेचा संदेश दिला. ते उदारमतवादी, लोकशाही मूल्यांचे समर्थक होते. सध्याच्या जातीयवादी शक्ती नेहरूंच्या दूरदृष्टी, त्यांची विचारधारा, त्यांचे आयुष्यभराचे योगदान आणि संघर्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंडित नेहरूंचे आदर्श आणि वारसा संपवण्याचा प्रयत्न करणा-यांच्या विरोधात आम्ही जोरदार लढा उभारू. पंडित नेहरूंनी निर्माण केलेले आदर्श समाजापुढे नेण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेहरू हे विचारांनी अजूनही जिवंत असून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी धर्माधतेच्या विरोधात लढा उभारायला हवा. धर्मनिरपेक्षता हा भारताचा आत्मा असून त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. सध्याच्या केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारे स्वच्छता अभियान केवळ फोटो काढण्यापुरता आहे. एका बाजूला रस्ते साफ करायचे आणि दुस-या बाजूला द्वेषाला खतपाणी घालायचे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानावर जोरदार टीका केली.
मुन्ना ! तू कभी सुधरेगा रे ?????????????.