गेल्या काही वर्षांपासून बॉलिवुडमध्ये ज्या जोडीच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा होती ती राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची जोडी अखेर विवाहबध्द झाली आहे.
मुंबई – गेल्या काही वर्षांपासून बॉलिवुडमध्ये ज्या जोडीच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा होती ती राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची जोडी अखेर विवाहबध्द झाली आहे. सोमवारी रात्री इटालीमध्ये अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा पार पडला.
स्वत:हा राणीने या विवाह झाल्याची घोषणा केली आहे. जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत इटलीमध्ये आमचा विवाह झाला. यावेळी यश चोप्रा यांची उणीव मला तीव्रतेने जाणवली. त्यांचे प्रेम-आर्शिवाद नेहमीच आदी आणि माझ्यासोबत असतील. आता माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा सुरु होत आहे असे राणीने सांगितले.
आदित्य चोप्रा बॉलिवुडचे प्रसिध्द दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा आहे. यशराज बॅनरच्या चित्रपटात काम करताना राणीचे आदित्य चोप्राबरोबर प्रेम जुळले. सुरुवातील चोप्रा कुटुंबाचा राणी आणि आदित्यच्या विवाहाला विरोध होता. कारण आदित्यचा पहिला विवाह झाला होता. हळूहळू चोप्रा कुटुंबाचा विरोध मावळला.
फेब्रुवारी महिन्यात जोधपूरच्या उमैद भवन पॅलेसमध्ये राणी आणि आदित्य सात फेरे घेणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी सर्वांचे अंदाज चुकवत साता समुद्रापार इटालीमध्ये विवाह केला. बच्चन घराण्याची सूनबाई होण्याच स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतर राणीची आदित्यबरोबर जवळीक वाढली. २०११ मध्ये या दोघांनी गपचुप विवाह केल्याचीही बातमी आली होती. मात्र नंतर राणीने स्वत:च ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.
Abhinandam Raniji and Aditya ji ! Shadi Mubarak !!! Ab Tisari Shadimye Hamye Jaroor invite karna .