रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांना गव्हर्नरपदावरुन काढून टाका ते देशासाठी योग्य व्यक्ती नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांना गव्हर्नरपदावरुन काढून टाका ते देशासाठी योग्य व्यक्ती नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
स्वामी यांची नुकतीच राज्यसभेत भाजपने खासदारपदी नियुक्ती केली आहे. स्वामी यांनी राजन यांच्या धोरणावर टीका करत त्यांना लवकर त्यांना पदावरुन काढून टाकण्यात यावे असा सरकारला सल्ला दिला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाचं नुकसान झालं आहे, त्यामुळं रघुराम राजन यांनी शक्य तेवढ्या लवकर देश सोडून शिकागोला जावे, जन यांचं धोरण देशाच्या अर्थव्यवस्थेला अनुकूल नाही. बँकेने वाढवलेल्या व्याजदरांमुळेच उद्योग तोट्यात गेले असल्याचा आरोप स्वामी यांनी राजन यांच्यावर केला आहे.
आपल्याला हुशार लोकांची गरज आहे का नाही असे वाटते