कॉ. पानसरे यांचे बलिदान झाले. अखेर कॉ. गोविंद पानसरे गेले. हल्लेखोर अजून सापडायचे आहेत. सहा दिवस होऊन गेलेत. पानसरेंनी मृत्यूशी झुंज दिली. शरीरात घुसलेल्या दोन गोळय़ा काढण्यात आल्या.
कॉ. पानसरे यांचे बलिदान झाले. अखेर कॉ. गोविंद पानसरे गेले. हल्लेखोर अजून सापडायचे आहेत. सहा दिवस होऊन गेलेत. पानसरेंनी मृत्यूशी झुंज दिली. शरीरात घुसलेल्या दोन गोळय़ा काढण्यात आल्या.
फुप्फुसामधली एक गोळी रक्त गोठवून गेली. कोल्हापूरला दोन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या होत्या. मुंबईतली शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि अखेर चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारा हा लढाऊ कॉ. अखेर डाव्या चळवळीचा निरोप घेऊन काळाच्या पडद्याआड गेला.
महाराष्ट्राच्या समाजजीवनात हमरस्त्यावर माफियांच्या हातात जे राजकारण गेले आहे, त्यातून हा दुसरा बळी गेला. नरेंद्र दाभोलकर यांना भर रस्त्यात मारण्यात आले. त्यांच्या हत्येमागे अगदी उघडपणे अंधश्रद्धेचा पुरस्कार करणारेच असले पाहिजे आणि कॉ. पानसरे याच्या हत्येमागे टोलमाफिया असले पाहिजेत.
आजचे टोलनाकावाले पेशव्यांच्या काळातील गारदी आहेत. याच गारद्यांनी पानसरे यांचा गेम केलेला आहे. इथून पुढे महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध, अपप्रवृत्तीविरुद्ध बोलणा-याला गोळय़ा घालून ठार मारू, असे यानिमित्ताने हे धटिंगण सांगत आहेत. आणि महाराष्ट्राचे बिनकामाचे मुख्यमंत्री पानसरे यांच्या मृत्यूच्या दिवशीच सत्कार घेत फिरत आहेत.
त्यांच्या कार्यक्रमात फटाके फोडले जात आहेत, अशा मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला लाज वाटते आहे. आणि हेच मुख्यमंत्री वाचाळवीर बनून सांगत आहेत की, आरोपींना नक्की पकडू. कारण पोलिसांची वीस तपासपथके सर्वत्र?पाठवलेली आहेत. आणि हल्लेखोरांचे रेखाचित्र?प्रसिद्ध झालेले आहे. काल सत्तेवर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांना माफिया टोळय़ांची कल्पना नाही.
कोण विचारतो तुमच्या रेखाचित्रांना! कोल्हापूरला पानसरे यांच्या अंत्यविधीला जायची माणुसकी तुम्ही दाखवू शकला नाहीत आणि कुंभमेळय़ाच्या बैठका घेत बसलात. अशा मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला लाज वाटते. महाराष्ट्राला कसला मुख्यमंत्री मिळालेला आहे! सामाजिक सभ्यता कशाशी खातात हे फडणवीसांना माहिती आहे का? महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध झाला पाहिजे.
पानसरे आयुष्यभर डावा विचार घेऊन लढत राहिले. त्यांचा सामना विषम होता. पण तत्त्वाला त्यांनी कधी मुरड घतली नाही. जे योग्य आहे ते बोलत राहिले. अपप्रवृत्तींविरुद्ध लढत राहिले. आज देशातले राजकारण सगळे पैशासाठी चाललेले राजकारण आहे.
अशा स्थितीत हा कफल्लक कॉम्रेड समाजाच्या प्रश्नासाठी लढत राहिला होता. जेव्हा अशा नि:स्वार्थ कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला गरज होती, त्याचवेळी कॉ. पानसरे यांचा दृष्ट शक्तींनी ‘गेम’ केलेला आहे. पण या दृष्ट शक्तींपेक्षाही संस्कृती आणि संस्काराची भाषणे देत फिरणारे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिक धिक्कार केला पाहिजे. कोणत्या प्रसंगात कसे वागावे याचे भान नसलेला हा माणूस महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे, याची महाराष्ट्राला आज शरम वाटते आहे. कसली भाषणे देता आणि कसली उद्घाटने करता आणि कोणत्या दिवशी? छ्छी! किळस यावी असे हे मुख्यमंत्र्यांचे दर्शन आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा निव्वळ धिक्कार करून आता हा महाराष्ट्र सभ्य होईल, असे वाटण्याच्या पलीकडचे विषय झालेले आहेत. गुंड आणि धटिंगण मोकाट सुटलेले आहेत. सरकारचा धाक नावाची वस्तू शिल्लक राहिलेली नाही. या स्थितीत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र तुम्ही?
आजच्या अंकातील ‘प्रवाह’ पुरवणीतील मुख्य लेख कॉ. पानसरे यांची प्रकृती स्थिर झाल्याची बातमी आल्यानंतर गुरुवारी छापायला दिला होता. त्या लेखातील संदर्भ त्या दिवसाचे आहेत. – संपादक
धिक्कार aso ya sarakaravha
धिक्कार असो या मुख्यमंत्र्याचा