अमेरिकेची जगविख्यात अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने माळीण येथील दुर्घटनेचा अंदाज एक दिवस आधीच दिला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
पुणे- अमेरिकेची जगविख्यात अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने माळीण येथील दुर्घटनेचा अंदाज एक दिवस आधीच दिला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मात्र, या दक्षतेच्या इशा-याकडे हवामान खात्याने दुर्लक्ष केल्याने गाव गडप होण्याची दुर्घटना घडली.
‘नासा’च्या वेबसाइटवर २९ जुलै रोजी माळीण गावासह भीमाशंकरचा संपूर्ण परिसर जांभळ्या रंगात दाखवला होता. म्हणजेच, तिथे १७५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. इतकेच नव्हे तर, भीमाशंकरसह गुजरातपर्यंतच्या संपूर्ण सह्याद्री परिसरात भूस्खलनाची भीती असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. हा इशारा पाहून धोकादायक प्रदेशातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची जबाबदारी प्रशासनाची होती.
परंतु, आपल्या हवामान खात्याने हा इशारा गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘नासा’च्या इशा-याबाबतची माहिती उघड झाल्यानंतर एकमेकांकडे बोटे दाखवण्याचे काम अगदी चोख केले जात आहे. हे ‘अॅलर्ट’ पाहण्याची जबाबदारी दिल्लीतील हवामान खात्याची असते, असे म्हणून पुणे वेधशाळेने हात झटकले आहेत. तर दिल्ली हवामानशास्त्र विभागाने जिओलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले.
‘नासा’च्या इशा-याकडे दुर्लक्ष करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीच्या धोक्याचा इशारा ‘नासा’ने आधीच दिला होता. पण आपल्याकडे सगळी सूत्रे ढगफुटीनंतरच हलली. त्यामुळे हजारो भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतरही आपल्या यंत्रणेची सुस्ती कायम आहे.
सोलून काढा ,सगळ्या हरामखोरांना…………
महाराष्ट्रात काय किंवा मुंबईत काय पावसाने,आतंकवादी हम्ल्याने हजारो मरतात,परंतू ,आर.आर.राव
साहेबाच्या खूर्चीत्ला एक ढेकूण सुद्धा .मरत नाही .याला म्हणतात खुर्चीप्रेम .!!!