गेले सहा दिवस चाललेले डंपर व गौणखनिज व्यावसायिकांचे आंदोलन काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या सामर्थ्यवान नेतृत्वाच्या पाठबळामुळे सर्व मागण्या मान्य होऊन यशस्वी झाले. या सर्वपक्षीय आंदोलनाचे खरे प्रमुख हीरो म्हणजेच मध्यवर्ती नायक ठरले काँग्रेसचे लढवय्ये आमदार नितेश राणे! आणि राणे साहेबांच्याच मुशीत तयार झालेले त्यांच्याचसारखे लढवय्या रक्ताचे, निधडय़ा छातीचे लढवय्ये मावळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याही धैर्याला तोड नाही. डंपर व्यावसायिकांच्या या आंदोलनात या सर्वाची फुटलेली डोकी, सांडलेले धगधगते रक्त आणि पोलिसांच्या अमानुष लाठीमारामुळे झालेल्या जखमा आणि अंगावर कायम राहणारे त्याचे व्रण याचे मोलही मोठे आहे. याची किंमतच होऊ शकत नाही.
या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांचा कातडीबचाव पळपुटेपणा आणि अवसानघातकीपणा तसेच श्रेय मिळण्यासाठी चाललेला फुकटचा आटापिटा आणि अत्यंत हीन दर्जाची फालतू राजकारणी वृत्ती दिसून आली. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ सनदी अधिका-यांचा मुजोरपणा खाली आला. सत्तेचा अगर लोकशाहीत मिळालेल्या अधिकाराचा त्यांना चढलेला माज आणि उन्मत्तपणाही उतरला. आपण लोकांसाठी, लोकांची कामे करण्यासाठी आहोत. कायद्याच्या चौकटीत राहूनही कायदा व व्यवहार यांची सांगड घालून जनतेची कामे करावयाची आहेत. आपली मनमानी अगर अधिकाराचा तोरा, मस्तवालपणा, मग्रुरी आणि सत्तेचा माज या कोकणभूमीत चालणार नाही. लोकशाही शासनप्रणालीत जनता अगर लोक सार्वभौम आहेत. आपण त्यांचे नोकर अगर चाकर आहोत. आपल्या भल्याबु-या वर्तणुकीचा जाब त्यांना द्यावा लागतो. याची जाणीवही या आंदोलनाच्या निमित्ताने सनदी अधिका-यांना झाली असावी अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे मांडलेल्या डंपर व गौणखनिज व्यावसायिक आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे सहा दिवस चाललेले डंपर व्यावसायिकांचे आंदोलन यशस्वी झाले. तत्पूर्वी भाजपा-सेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हात हलवत परत आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आश्वासन देऊन बोळवण केली होती. मात्र नारायण राणे यांनी अधिका-यांच्या बदलीची मागणी न करता आंदोलकांचे प्रश्न अभ्यासपूर्णपणे मांडले. त्यामुळे ते प्रश्न, त्या मागण्या मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना मान्य कराव्याच लागल्या व ते प्रश्नही सन्मानपूर्वक सोडवावे लागले. जे काम भाजपा-शिवसेनेचे आमदार, खासदार अन्य नेते तसेच पालकमंत्र्यांनाही जमले नाही ते नारायण राणे यांच्या एका वर्षा बंगल्यातील चर्चेतून सुटले. यावरून राज्याच्या सत्ताकारणात कोणाचीही सत्ता असो, राणे यांच्या शब्दाला व त्यांना किती सन्मान दिला जातो हेही कोकणातील जनतेने पुन्हा एकदा पाहिले.
सर्वपक्षीय आंदोलनाच्या निमित्ताने भाजपा-शिवसेनेचे आमदार, खासदार, माजी आमदार व पालक मंत्री आणि त्या पक्षाचे पदाधिकारी यांचा अवसानघातकी पळपुटेपणाही या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला. शनिवारी सायंकाळी लाठीमार व त्यानंतर काँग्रेसचे आ. नितेश राणे व अन्य प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांना अटक झाल्यानंतर आणि काही पोलिसांच्या लाठीमारात जायबंदी होऊन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या आंदोलनातून भाजपा-सेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी पसार झाले. काही जण काँग्रेसने आंदोलन ‘हायजॅक’ केल्याचे रडगाणे मीडियासमोर गाऊ लागले. मुख्यमंत्र्यांकडे जाऊनही त्यांनी तेच रडगाणे गायले. काँग्रेसने आंदोलन चिघळविले हे त्यांचे पालूपद होते. काँग्रेसवाल्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या संगनमताने आंदोलन चिघळवले, अशीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अजब व हास्यास्पद तक्रार केल्याची मीडियासमोर कबुली दिली. दुस-या दिवशी रविवारी तर त्यांनी या अवसानघातकी पळपुटेपणाची जाहीर वाच्यता अगर कबुली म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आश्वासन दिल्याने सर्वपक्षीय आंदोलन मागे घेत असल्याची सेनेचे खासदार विनायक राऊत व अन्य सेना-भाजपा नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली एकतर्फी घोषणा अर्थात त्यांच्याकडून काहीही होणार नाही याची खात्री असल्यानेच आंदोलनकर्त्यांनी त्यांना न जुमानता आंदोलन चालूच ठेवले.
एवढेच नव्हे तर त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे गा-हाणे मांडून आपल्याला न्याय मिळवून द्या, अशी विनंतीही केली. त्यानंतर जिल्ह्यातील जनताही आपलीच आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर केलाच पाहिजे, त्यांना न्याय मिळवून द्यायला हवा, ही भावना कायम बाळगून काम करणारे नारायण राणे यांनी मग राज्यस्तरावर सूत्रे हलवली. मुख्यमंत्री-महसूलमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनीही प्रतिसाद देत नंतरच्या काळात राणेसाहेबांशी संपर्कात राहत आंदोलनात सन्माननीय तोडगा काढण्याची, मागण्या मान्य करण्याची ग्वाही देत आंदोलन थांबवा, अशी विनंती केली. सरकारी पातळीवरून सूत्रे हलली, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे सिंधुदुर्गात दाखल झाले. बुधवारी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत वर्षा बंगल्यावर गेले.
चर्चा झाली आणि राणे साहेबांच्याकडून आंदोलनकर्त्यांच्या मांडण्यात आलेल्या मागण्या सन्मानपूर्वक मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आंदोलन यशस्वी झाले. राणे साहेबच जिल्ह्यातील जनतेवरील अन्याय दूर करू शकतात. तेच त्यांच्यासाठी धावून जातात. तेच कोकणी जनतेचे खरेखुरे कैवारी आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र याचा आता तरी कोकणातील जनतेला विसर पडू नये अशी अपेक्षा आहे.
आमदार नितेश राणेंच्या लढवय्या नेतृत्वाची आणि संवेदनशील मनाचीही ठरली कसोटी
गुरुवार दि. ३ मार्च रोजी डंपर व्यावसायिकांचे हे सर्वपक्षीय आंदोलन सुरू झाले. व्यावसायिकांच्या आंदोलनाला हे काँग्रेसप्रमाणेच भाजपा-शिवसेना, मनसे या सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता व त्यांचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार,पदाधिकारी प्रत्यक्षात आंदोलनात सहभागीही झाले होते. पहिल्या दोन दिवशी या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेनेही दखल घेतली नव्हती. शनिवारी सायंकाळी ४ वा.पर्यंत जिल्हाधिकारी अगर जिल्हा प्रशासनातील कोणीही वरिष्ठ अधिका-यांनी या आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्याचे सौजन्यही दाखवले नव्हते. त्यावेळी उपोषण आंदोलनात सहभागी असलेले सेना-भाजपाचे आमदार, माजी आमदार यांनाही जिल्हा प्रशासनाने त्यांचे कणाहीन नेतृत्व तसेच त्यांचे पाणी जोखून बेदखल केले होते. त्यावेळी या नेत्यांकडून काहीही होणार नाही याची खात्री झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या वतीने काँग्रेसचे तडफदार, लढवय्ये आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना आंदोलनात लक्ष घालण्याची विनंती करून निमंत्रित करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सौजन्यही जिल्हाधिकारी दाखवत नाहीत ही प्रशासकीय मग्रुरीच होती. नितेश राणे आंदोलनस्थळी गेले आणि त्यांनी चर्चेसाठी जिल्हाधिका-यांचे दालन गाठले. त्यावेळी ते दालन आतून बंद करून कडी घालून बसले होते. त्याचदरम्यान पोलीस आणि रॅपिड अॅक्शन दलातील जवान लाठय़ा परजत आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीमार करून त्यांना रक्तबंबाळ व जायबंदी करत त्यांची डोकी फोडत, जखमी होऊन खाली पडलेल्यांवरही अजिबात दया, माया न बाळगता हिंस्र श्वापदाप्रमाणे पोलीस जवान आंदोलनकर्त्यांना तुडवत होते. बेधुंदपणे मिळेल त्याच्यावर लाठीमार करत होते. पोलिसांचा हा अमानवी आवेश पाहून सेना-भाजपाचे लोकप्रतिनिधी, नेते कातडी बचावण्यासाठी पसार झाले; पण जखमी-जायबंदी होण्याची अगर जीवाची कोणतीही पर्वा न करता आंदोलनकर्त्यांवरील हा लाठीमार झेलण्यासाठी आमदार नितेश राणे लढवय्या योद्धय़ाप्रमाणे धावले. अन् त्या क्रूरकर्मा पोलीस जवानांना आडवे गेले आणि गरजले ‘त्या निष्पापांना मारू नका, प्रथम मला मारा, माझ्या डोक्यावर लाठी हाणा’, नितेश राणे यांच्या धाडसी त्वेषामुळे काही आंदोलनकर्ते वाचले. ‘नितेशजींच्यामुळे आमचा जीव वाचला नाहीतर आमचा चेंदामेंदाच झाला असता.‘पोलिसांच्या लाठीमारात जायबंदी होऊन रुग्णालयात उपचार घेणा-या आंदोलनकर्त्यांची ही एका शब्दाची बोलकी प्रतिक्रिया नितेश राणेंच्या शौर्याची, त्यांच्या लढवय्या नेतृत्वाची कसोटी ठरलेली त्यांच्या अंत:करणातील माणुसकीच्या ओलाव्याची आणि संवेदनशीलपणाचीही.. म्हणूनच या आंदोलनाचे खरे प्रमुख हीरो, मध्यवर्ती नायक आमदार नितेश राणे ठरले आहेत. या आंदोलनाचे खरे श्रेय काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याप्रमाणेच आमदार नितेश राणे आणि त्यांच्या लढवय्या काँग्रेसच्या मावळ्यांकडेच जाते.
नमस्कार राणे साहेब, आपण आजपर्यंत सामाजिक जीवनात समाज्यासाठी, लोकांसाठी, त्यांचे प्रश्नांना वेळोवेळी आपण सोडवण्याचा प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आम्ही तरुण मंडळी पाहत आलेलो आहोत. समाजातील प्रत्येक घटकाकडे आपला पाहण्याचा दूर दृष्टीकोन व त्या विषयी असलेली तळमळ हि आपल्या भाषणातून उमजते…… आणि त्याच कुशीतून निलेश जी व नितेश जी हे छावे महाराष्ट्राला मिळाले….. धन्यवाद नारायण राणेसाहेब.