डोंगरकडा कोसळून लुप्त झालेल्या माळीण गावाला गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पुणे – डोंगरकडा कोसळून लुप्त झालेल्या माळीण गावाला गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. राष्ट्रीय आपती व्यवस्थापन दलाकडून सुरु असलेल्या बचावकार्याचा सिंह यांनी आढावा घेतला.
माळीण गावाच्या पूर्नवसनासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून सर्वोतपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. माळीण गावातील दृश्य मन सून्न करुन सोडणारे आहे. कालपर्यंत इथे एक गाव होते असे वाटतच नाही ही एक अत्यंत वाईट नैसर्गिक दुर्घटना आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
माळीणबद्दल समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला लगेच इथे येण्यास सांगितले होते. मात्र रात्रीच्यावेळी इथे येणे योग्य ठरणार नाही असे मला सांगण्यात आले त्यामुळे मी सकाळी आलो असे सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी केंद्र सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, शिरुरचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आणि पुण्याचे भाजप खासदार अनिल शिरोळे त्यांच्यासोबत होते.
कही. ये मगर मछ के आंसू तो नही. ????