कधी पाऊस तर कधी उन्हाचा तडाखा या हवामानातील बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
मुंबई- कधी पाऊस तर कधी उन्हाचा तडाखा या हवामानातील बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
या बदलत्या वातावरणामुळे साधा ताप, हिवताप, सर्दी, खोकला आणि जुलाब या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
या आजारांवर वेळीच उपचार करण्यात आले नाहीत तर हे आजार बळावण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. अमित सिंह यांनी दिली.
मुंबईतील जनजीवनावर जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांचा परिणाम होतच असतो. दरम्यान, अवकाळी झालेला पाऊस, हवेतील कोरडेपणा, गारवा हे वातावरणात झालेले बदल काही दिवसांपासून अनुभवायला मिळत आहेत.या बदलत्या वातावरणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर त्यांचा निश्चितच परिणाम होताना दिसून येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजारांनी ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे, असेही डॉ. सिंह यांनी म्हटले. याशिवाय वातावरणात अचानक गारवा वाढल्याने हाडे, सांधे कमकुवत होणे, अंग दुखणे यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्येही प्रकर्षाने वाढ होत आहे.
इतकेच नव्हे तर शहरातील कचरा, घरांजवळ अनावश्यक साठवून ठेवलेले पाणी यामुळेही आजारांचा फैलाव मोठया प्रमाणात होतो, असेही ते म्हणाले. तसेच मुंबईत झाडे तोडण्यात येत असल्याने प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे माणसांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होताना पाहायला मिळत आहे.
पूर्वी मुंबई हे शहर तेथील स्थानिक लोकांपर्यंत विस्तारित होते, परंतु या शहरावर परप्रांतीयांचे होणारे आक्रमण यामुळे विकासाच्या नावाखाली गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या, जी मोकळी किंवा चांगली सुपीक जमीन रिकामी दिसेल तिथे विकासक पैसा कमावण्याच्या नादात सर्व मुंबई काबीज करू लागला. चांगली हिरवळीची जमीन जमीनदोस्त करून तेथे इमारत बांधण्यास पालिका परवानगी देतेच कशी? कधी भाजीपाला विकण्यास तर कधी इमारत बनत असेल तर त्या करिता लागणारे साधन सामुग्री विकण्यास परप्रांतीयांनी जागा अडवल्या. त्याच पैश्यात त्यांनी मुंबईवर कब्जा केला. आता तर त्यांनी नोकरीत हि वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आपल्या ओळखीच्या साहेबाशी ओळख वाढवून संपूर्ण दिवस बसून महिना भराचा गलेलट्ट पगार लाटायचा, अशा कितीतरी खाजगी कंपन्या तयार करून सरकारी कामाचे कंत्राट घ्यायचे आणि जो काही नफा येतो तो आपल्याच ओळखीच्या व्यक्तीस पगाराच्या स्वरुपात वाटायचा म्हणजे तो काम करो किंवा नको करो आणि त्याच पगाराच्या स्वरुपात इमारतीत जागा घेणे म्हणजे अप्रत्यक्षात त्या पैशाला “काळा धन” हे नाव आयकर विभागाने दिले पाहिजे. मुंबईतील जनजीवनावर जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांचा परिणाम होत आहे याचे मूळ कारण म्हणजे अशी परप्रांतीयामुळे वाढत आलेली लोकसंख्या, फुक्कट मिळत असलेला पगाराच्या स्वरुपात “काळा धन” ज्यामुळे गाडी घेण्यास कोणतीही चिंता नाही, त्यामुळे वायूप्रदूषण. कामाचे कोणतेच टेन्शन नसल्याने दुसऱ्यास आवाजाच्या स्वरुपात देण्यात येणारे ध्वनीप्रदूषण. हे सर्व प्रदूषण तीच माणसे पसरवू शकतात ज्यांना मेहनत न करता पैसा मिळतो आणि हे जे पर प्रांतीय आले आहेत ते हेच प्रदूषण पसरवण्यास. कधी कधी कित्येक व्यक्ती परदेशात हि नोकरी करता जातात पण तेथील रहिवाशी त्यांना घर किंवा दुकाने घालण्यास परवानगी देत नाही. ते त्या व्यक्तीस तोंडावर बोलतात कि ये “दुबई है मुंबई नही”. कल तू यहा कि जमीन लेगा और घर है इसलिये दोस्त को बुलायेगा फिर बिवी को बुलायेगा और फिर तेरा दोस्त और तेरे दोस्त को बुलायेगा”. “ना हम जियेंगे ना तुम्हे जिने देंगे” हे ब्रीदवाक्य बोलूनच ते आपल्या आई वडिलांवर लाथ मारून येतात, त्यांच्या अल्लडपणामुळे ते घरदार सोडून येतात आणि स्थानिक उमेदवारांच्या हि पोटावर लाथ मारतात. म्हणून “थ्री इडियट”मधील आमीर खान हि नवजात पाल्यास येताना म्हणतो तू अंदर हि रहे, क्योंकी बाहर बहुत बडा COMPETITION है. महाराष्ट्र सरकार आपले कोणत्याही राज्यातील येणाऱ्या व्यक्तीस मुंबईत येण्यास मुबा देते आणि स्थानिक व्यक्तीस “हम दो हमारे दो” हा संदेश देते .