अनधिकृत बांधकामांची समस्या फक्त ठाणे शहरापुरती मर्यादित नाही. या बांधकामात सामान्य माणूस राहात आहे. अनधिकृत बांधकामे करणा-यांना माफी नाही, परंतु तेथे राहणा-यांना बेघर केले जाऊ नये.
ठाणे – अनधिकृत बांधकामांची समस्या फक्त ठाणे शहरापुरती मर्यादित नाही. या बांधकामात सामान्य माणूस राहात आहे. अनधिकृत बांधकामे करणा-यांना माफी नाही, परंतु तेथे राहणा-यांना बेघर केले जाऊ नये.
सध्या जी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, ती भविष्यात मृत्यूचे सापळे होणार आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींची समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीयदृष्टय़ा सामुदायिक विकासातून (क्लस्टर डेव्हलपमेंट योजना) नागरिकांना घरे मिळाली पाहिजेत, अशी सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी वर्तकनगरमध्ये रविवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गणेश नाईक बोलत होते. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी प्रदेश महिला अध्यक्ष विद्या चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
धोकादायक असलेल्या इमारती आताच पाडल्या पाहिजेत, असेही नाईक यांनी सांगितले. धोकादायक इमारतींत कोणी राहू नये म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अमलात आणण्याचा विचार आहे. या योजनेबाबत महिना-दीड महिन्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. ही योजना राबवताना रहिवाशांना दुप्पट चटई क्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे लोकसंख्या दुप्पट होणार आहे. या दुप्पट लोकसंख्येस पाणी, मलनिस्सारण, घनकचरा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचा विचार करण्यात येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत
शिवसेनेच्या उपमहिला विभागप्रमुख प्रकाशी नाडर, भाजपच्या उपाध्यक्ष शुभांगी खांडेकर, बसपाचे बानुकुमार कांबळे, रिपाइंचे प्रकाश कोकणे, प्रमोद नेहरकर आदींनी या मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला.
It’s really great that people are sharing this infaimotron.