अनामत रक्कम पाचेश रुपयांवरुन पंचवीस हजार रुपये केली. मात्र रक्कम वाढवूनही उमेदवारांची संख्या कमी झालेली नाही. उलट वाढत्या अनामत रक्कमेबरोबर उमेदवारांची संख्याही वाढत चालली आहे.
नवी दिल्ली– निवडून येण्याची शक्यता नसलेल्या उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांची अनामत रक्कम पाचेश रुपयांवरुन पंचवीस हजार रुपये केली. मात्र रक्कम वाढवूनही उमेदवारांची संख्या कमी झालेली नाही. उलट वाढत्या अनामत रक्कमेबरोबर उमेदवारांची संख्याही वाढत चालली आहे.
१९९८ मध्ये ४,७५० उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये हेच प्रमाण ७,५१४ होते. महत्वाचे म्हणजे ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होते. सर्वाधिक ८० खासदार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये एकहजारहून अधिक उमेदवार निवडणूक लढवतात. त्याखालोखाल मध्यप्रदेश बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.
२००९ मध्ये महाराष्ट्रातून ८१९ उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात होते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामागे उमेदवारांचे सरासरी प्रमाण १७ होते. देशातील सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण १४ आहे. मात्र तामिळनाडूमध्ये हेच प्रमाण जास्त आहे.
३९ खासदार असलेल्या तामिळनाडूमध्ये २००९ मध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून २१ उमेदवार रिंगणात होते. २०१४ मध्ये आप सारख्या पक्षांमुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. जाती-धर्माच्या आधारावर मते खाऊन एखाद्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक जण निवडणूक रिंगणात उतरतात. प्रसिध्दीसाठी इच्छुक असणा-यांसाठी २५ हजार ही आता जास्त रक्कम राहिलेली नाही असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन.गोपालस्वामी यांनी सांगितले.
निवडणूक वर्ष | उमेदवार संख्या |
१९९८ | ४,७५० |
२००४ | ५,४३५ |
२००९ | ७.५१४ |
असल्या उमेदवांवर मतदारांनी बहिष्कार टाकाव.