जिल्हा काँग्रेसची जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्या खांद्यावर द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मंडणगड- जिल्हाध्यक्षांअभावी काँग्रेस पक्ष रत्नागिरीतील प्रत्येक तालुक्यात फुटीच्या मार्गावर असल्याने प्रदेश कार्यकारिणीने नेतृत्वहीन जिल्हा काँग्रेसची जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्या खांद्यावर द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
सक्षम नेतृत्वाअभावी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत पक्षाला जिात मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यात चांगली लढत देऊनही सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला़ नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्हात ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा सक्षम नेतृत्वाची गरज आहे.
निलेश राणे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला बळ दिल्यास गावागावात विखुरलेला युवा कार्यकर्ता संघटित होण्यास मदत होईल. त्यामुळे पक्ष वाढीस मोठी मदत होईल. पांरपरिक मतदानावर ठाम असलेल्या काँग्रेसची मते गेल्या काही निवडणुकांत अन्य पक्षांकडे फिरली आहेत. दुसरीकडे पक्षवाढीसाठी कोणताही ठोस कार्यक्रम राबवलेला नाही. त्यामुळे निलेश राणे यांच्या रूपाने सक्षम जिल्हा नेतृत्व पुढे आणण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
या मागणीला तालुका उपाध्यक्ष समद मांडलेकर, खजिनदार राजा लेंडे, युवक उपाध्यक्ष कादीर बुरोंडकर, महिला आघाडी शहराध्यक्ष सुरक्षा शेटय़े, नगरसेवक प्रबोध कोकाटे, श्रद्धा लेंढे, स्नेहल मांढरे, वैशाली रेगे यांचा पाठिंबा आहे, असे मांढरे यांनी स्पष्ट केले.
नमस्कार साहेब आपण मांडलेला विचाराशी मी सहमत आहे नीलेश साहेबांसारख नेतृत्वाची सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अत्यंत गरज आहे