रायगड जिल्ह्यातील वाळीत प्रकरणे एकामागून एक उघड होत आहे. या अनिष्ठ प्रथेतून महिला देखील सुटलेल्या नाहीत.
अलिबाग – रायगड जिल्ह्यातील वाळीत प्रकरणे एकामागून एक उघड होत आहे. या अनिष्ठ प्रथेतून महिला देखील सुटलेल्या नाहीत. श्रीवर्धन तालुक्यातील वडघर गावच्या सतीची वाडी येथील रसिका मांडवकर यांच्या कुटुंबाला गावकिने आठ वर्षापूर्वी क्षुल्लक कारणातून वाळीत टाकले आहे.
कुटुंबाला वाळीत टाकल्यापासून रसिकाचे पती रमेश मांडवकर हे बेपत्ता आहेत. त्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. पती बेपत्ता झाल्यानंतर रसिका यांनीही गाव सोडले. त्या मुंबईत घरकाम करू लागल्या. गावकीचा १० हजार रुपये दंडही त्यांनी भरला. मात्र त्यांच्यावरील अन्याय कमी होत नव्हता. आता गावात नवीन घर बांधायला घेतल्यानंतर तेथेही गावकी आडवी आली आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घर बांधलेस तर ते गावकीच्या नावावर करू दे, ही गावकीची मागणी तिने मान्य केली नाही त्यामुळे तिला गावाच्या बाहेर काढण्यात आले आहे. तशी तक्रार तिने पोलिसंकडे केली आहे . गावात असा काहीच प्रकार झाला नसल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.
सर्वात जमेची बाजू म्हणजे गावातील नातेवाईक रसिकाच्या बाजूने उभे राहिले आहेत. तिच्या बाजूने उभे राहिलेत आणि रासिकाला आसरा दिला म्हणून त्यानाही दंड थोटावण्यात आला व तिला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. रसिकाने पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार येताच पोलिसांनी ग्रामस्थांची बैठक लावली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले . मात्र रसिका स्वता: हजर नसल्याने निर्णय घेता येत नसल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार चाफेकर यांनी सांगितले आहे.
तय गावचा सरपंचाला पोकळ ओल्य बांबू चे फटके मारा