Friday, May 3, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेखविशेष संपादकीय- पुन्हा एकदा ‘अपने आप’ की जय!

विशेष संपादकीय- पुन्हा एकदा ‘अपने आप’ की जय!

इतिहासाची पुनरावृत्ती कधी, कशी कोणत्या स्वरूपात होईल हे आपल्याला सांगता येत नाही. ‘भ्रष्टाचार विरोधी आंदोलना’चे प्रणेते अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टीने’ (‘आप’) ज्या पद्धतीने केवळ एक वर्षात दिल्ली विधानसभेत यश मिळवले आहे, ते पाहून इतिहासाच्या पानात दडलेल्या अशाच एका ‘आम आदमी’च्या ‘आप’ आंदोलनाची आठवण होते…
इतिहासाची पुनरावृत्ती कधी, कशी कोणत्या स्वरूपात होईल हे आपल्याला सांगता येत नाही. कधी इतिहास आपली एखादी झलक वर्तमानाच्या पटलावर उभी करतो तर कधी जुन्या काळाला आधुनिक स्वरूपात लोकांसमोर आणतो. अर्थात ही इतिहासाची पुनरावृत्ती प्रत्येक वेळेस लक्षात येतेच असे नाही. ब-याचदा अगदी अचानकपणे ही वस्तुस्थिती डोळय़ांसमोर उभी राहते आणि आपल्याला तिच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देते. ‘भ्रष्टाचार विरोधी आंदोलना’चे प्रणेते अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टीने’ (‘आप’) ज्या पद्धतीने केवळ एक वर्षात दिल्ली विधानसभेत यश मिळवले आहे, ते पाहून इतिहासाच्या पानात दडलेल्या अशाच एका ‘आम आदमी’च्या ‘आप’ आंदोलनाची आठवण होते.

वास्तविक पाहता दिल्लीतील राजकारणात ‘आप’ने मिळविलेल्या यशामुळे निवडणुकीच्या पारंपरिक प्रक्रियेला वेगळे वळण मिळाले आहे. दिल्लीत १५ वर्षे सत्तेत असणा-या शीला दीक्षित यांचा केजरीवाल यांनी पराभव करणे, या गोष्टीकडे जसा काँग्रेसला कानाडोळा करता येणार नाही, तद्वत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये बहुमत मिळविणा-या; परंतु दिल्लीत काठावर पास झालेल्या भाजपलाही या ‘आप’ क्रांतीकडे डोळेझाक करता येणार नाही. कारण राजकारणात होत असलेल्या नव्या बदलांची ही नांदी आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात, जेव्हा प्रशासन, सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगण्याची साधनेही धुळे- नंदुरबार परिसरातील सातपुडा पर्वतराजीतील जंगलात पोहोचली नव्हती. त्या काळात ‘आपश्री’ गुला महाराज या आदिवासी संताने समाज परिवर्तनाची जोरदार चळवळ उभी करून दुर्गम भागातील दुर्लक्षित लोकांना ‘आवाज’ दिला होता. वारकरी संत-पंरपरा मानणा-या या गुला महाराजांनी ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ या ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीनुसार ‘आप’ या शब्दाची सर्वव्यापी संकल्पना मांडली होती. आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, असे सांगतांना गुला महाराजांनी ‘आप’ म्हणजे जनता जनार्दन. त्याचा विकास महत्त्वाचा. या ‘जनता जनार्दना’ची आरती करा, मूर्ती किंवा तसबिरीत देव नसतो, तो असतो माणसांमध्ये. त्यामुळे जेव्हा आपण एकमेकांना भेटतो त्या वेळी इतर काही म्हणण्यापेक्षा ‘आप की जय’ म्हणा असे गुला महाराज वारंवार सांगायचे. १८ जुलै १९३८ पर्यंत, म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी ‘आप’च्या सर्वागीण विकासाची आस धरली होती. आपल्या लोककल्याणकारी आंदोलनाला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. ‘आदिवासी विकासाचे शिल्पकार’ या पुस्तकात डॉ. गोविंद गारे यांनी गुला महाराजांच्या जनता जनार्दन आरतीचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते लिहितात, ‘दिवेलागणीच्या सुमारास सर्व आरत्या पेटविल्या जात, हजारो आरत्या ‘आप’ तत्त्वास म्हणजे जनता जनार्दनास ओवाळू लागत. सर्व माणसांच्या मस्तकावर त्या हजारो दीपज्योतींचा प्रकाश येत असे. ते रमणीय दृश्य पाहून कोणाचेही मन उदात्त भावनेने उचंबळून आल्याशिवाय राहत नसे.’

आज दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या यशाने कोटय़वधी सुजाण नागरिकांचे चेहरे उजळून निघाले आहेत. दिल्लीतील निवडणूक निकालात सत्तारूढ काँग्रेस आणि सत्ताकांक्षी भाजप या दोन्ही प्रस्थापित पक्षांना ‘आम आदमी’चे अस्तित्व दाखवून देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो पाहून देशातील राजकारणात आता ख-या अर्थाने मतदार राजा प्रकाशझोतात येईल, असे वाटते. त्याचे प्रश्न, त्याचे जगणे अर्थात त्याचे मरणेही नेहमीप्रमाणे काळाच्या काळोख्या पडद्याआड झाकलेले असायचे. ते आता नवजागृतीच्या राजकारणात प्रकाशात येईल.

मुख्य म्हणजे देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाच्या डोक्यात राजकीय हक्काचा-कर्तव्याचा प्रकाश पडल्यामुळे अवघी राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. आम आदमी पक्षाने आपले उमेदवार ठरविताना सर्वसामान्य माणसांना प्राधान्य दिले होते. निवडणूक चिन्ह म्हणून ‘झाडू’ची विचारपूर्वक निवड करून राजकारणातील गलिच्छ प्रकारांची ‘सफाई’ करण्याचा मनसुबा स्पष्ट केला होता. आपला निवडणूक निधी फक्त २० कोटी रुपये असणार आणि तो खुलेपणाने लोकांकडून गोळा केला जाईल, असे केजरीवाल यांनी जाहीर केले होते. ते तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी २० कोटी रुपये जमा होताच निधी घेणे बंद केले. हे सारे भारतीय राजकारणासाठी नवे होते. तीच गोष्ट प्रचार यंत्रणेची. सर्वच राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्त्यांना पैसे आणि इतर अनेक आमिषे दाखवावी लागतात; पण आम आदमी पक्षाने नव्या दमाच्या तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणून एक चांगला पायंडा पाडला आहे.

समाजात सकारात्मक बदल करण्यासाठी, देशासमोरील महागाईपासून दहशतवादापर्यंतच्या विविध समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच उत्तरे शोधावी, हा या एकूण चळवळीचा हेतू होता. अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल आंदोलन आणि महिलांवरील अत्याचारांविरोधातील ‘निर्भया’ आंदोलनामुळे अवघी दिल्ली घुसळून निघाली होती. त्या वेळच्या जनभावना इतक्या तीव्र होत्या की, वर्षभरानंतरही त्यांची धग कायम होती आणि नेमक्या याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शीला दीक्षित यांना पायउतार व्हावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. त्याची जाण असल्यामुळे चारही राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे,’ असे सांगितले आहे. तर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत सत्ता संपादण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत न मिळाल्याने भाजपात बरीच अस्वस्थता आहे. त्यामुळेच असेल कदाचित भाजप प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी ‘आप’च्या यशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

थोडक्यात सांगायचे तर देशाच्या इतिहासात प्रथमच आपल्या राजधानीत सर्वसामान्य माणसाला केंद्रभागी ठेवून राजकारण करण्याचे स्वप्न पाहणारा पक्ष सत्तेच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. या एका घटनेमुळे जर देशातील मतदारांमध्ये आपल्या अधिकारांबद्दल, हक्क आणि कर्तव्याबद्दल जाणीव जागृती होत असेल, तर त्याचे सगळय़ांनी स्वागत केले पाहिजे.

‘आप’ने आम आदमी विधानसभेत जावा यासाठी केलेल्या प्रयत्नांचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे; परंतु दिल्लीतील विधानसभा त्रिशंकू स्थितीत राहणार असेल तर त्यांच्या ‘नवख्या’ आमदारांची भाजपच्या बनेल नेतृत्वाकडून ‘शिकार’ होणार नाही, याची केजरीवाल आणि कंपनीला काळजी घ्यावी लागेल; कारण विरोधासाठी विरोध करणे आणि पदावर आरूढ असताना व्यवस्थेला विरोध करणे या दोन्ही गोष्टी परस्पर भिन्न आहेत. त्यामुळे पुढील काळात ‘आप’ला नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.

भिल्ल आणि अन्य आदिवासी लोकांमध्ये ‘आप मंडळ’ स्थापन करून नवी जागृती निर्माण करणारे गुला महाराज यांच्या निधनानंतर त्यांची चळवळ पुढे नेण्याचे काम त्यांचे भाऊ आणि मुलाने चांगले केले होते. त्यांच्यामुळे संघटित झालेला आदिवासी आपल्या हक्कांसाठी भांडू लागला होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या इंग्रज प्रशासनाने आणि स्थानिक पुढा-यांनी पद्धतशीरपणे त्या चळवळीचे खच्चीकरण केले. ‘आप मंडळ’ विविध आमिषांच्या मागे लागले. परिणामी उदात्त हेतूने उभी राहिलेली चळवळ मार्गभ्रष्ट झाली. त्याची पुनरावृत्ती ‘आप’च्या या आधुनिक आविष्काराची होऊ नये, एवढीच अपेक्षा!

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. abhyaspurna lekh…saggla thik pan pudhe kai? AAP kade leadership qualities chi maansa ahet? te ekatra kiti varsha rahu shaktil? yogya netrutva kiti mahatvacha role play karta he congress chya result kade baghun shiknyasarkha naiye ka? badal nishitach changla ahe..pan to tikun rahnyasathi ani vadhnyasathi kai kai karaila lagel yachya suchna dilyas jast prabhavi vatel…suraajya ha pratyek naagrikacha hakka ahe…pan satta tikvun thevnyatach sagli energy kharcha zali tar kaam kadhi ani kase karnar? aaj challenge k saath kuni mahaagaai ani bhrashtaachar kami karun dakhvu shakto ka? satta haasil karne ha jar uddesh navta ya lokancha tar mag raajkarnaat ka aale? raajkaran yedya gabalyancha khel ahe ka?

  2. लेख खूप वास्तव व अपरिचित इतिहासची उत्कृठ सांगड साधणारा आहे. लेखाचा मूळ गाभा हा भारतीय मानसिकता,संघटन कौशल व आपल्या ध्येर्या धोरणाशी प्रामाणिक राहण्याकरिता मोजाव्या लागणारा त्याग बरोबरच निर्धाराचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सामाजिक विचाराची प्रचीती आली धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट