केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वाढलेल्या असहिष्णूतेबाबत अनेक लेखक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, विचारवंतांबरोबरच बॉलीवूडचा ज्येष्ठ अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने उघड नाराजी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली- केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वाढलेल्या असहिष्णूतेबाबत अनेक लेखक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, विचारवंतांबरोबरच बॉलीवूडचा ज्येष्ठ अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यात असहिष्णूतेने कळस गाठला असून माझ्या पत्नीने देश सोडण्याचा सल्ला मला दिला होता, असे वक्तव्य आमीर खानने केले.
आमीरची ही स्पष्ट टीका भाजपाला झोंबली असून तुझ्यामुळे देशाची प्रतिमा खराब होत असल्याची गर्भीत धमकी त्याला देण्यात आली आहे. दमबाजी, तिरस्काराने देशातील समस्या सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिली.
एका मुलाखतीत आमीर खान म्हणाला की, मी आणि माझी पत्नी किरण अनेक वर्षापासून भारतात राहत आहोत. मात्र आता गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून देशातील वातावरण गढूळ झाले असून असहिष्णूता वाढत आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असून आपल्या मुलांवर याचा परिणाम होणार असल्याने आपण भारत सोडूया, अशी अगतिकता माझी पत्नी किरण राव याने व्यक्त केली.
मोदी सरकारवर अनेक विचारवंत, लेखक, शास्त्रज्ञ नाराज असून त्यांनी आपले सरकारी पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला. आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीरनेच असहिष्णूतेच्या विरोधात टीका केल्यानंतर संपूर्ण देशातून आमीरच्या बाजूने व विरोधात उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या.
सत्ताधारी भाजपाला आमीरची टीका झोंबली असून शाहनवाझ हुसैन यांनी त्याच्यावर तोफ डागली आहे. आमीर व त्याचे कुटुंबीय अन्य कोणत्या देशात जाणार? भारताशिवाय अन्य कोणताही चांगला देश नाही? भारतीय मुस्लिमाला हिंदूशिवाय कोणताच चांगला शेजारी मिळणार नाही.
मुस्लिम देश व युरोपात काय परिस्थिती आहे? तेथे सर्वत्र असहिष्णूतेचे वातावरण आहे, असे ते म्हणाले. तर आमीरच्या वक्तव्याचे समर्थन करताना कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, दमबाजी, तिरस्काराने देशातील समस्या सुटणार नाहीत.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कारभारावर टीका करणा-यांना देशद्रोही संबोधणे योग्य ठरणार नाही. मोदी यांनी समस्येच्या मूळाशी जाऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मग अमीर ने देश सोडून जावे… आमचा देश आमाला प्यारा आहे…आणि कोणाला वाटत असेल तयनी पण वाटेला लागावे आमचा देशातून,,,
पाकिस्तान प्रेमी अमीर खान याने आपण किती नीच आणि नालायक आहोत याचे दर्शन सबंध जगाला घडविले आहे. आणि नेहमी प्रमाणेच कोन्ग्रेसने आपला मोदी विरोध इथेही पाजळला. या दोन दिवसातील सर्वच ऑनलाईन वृत्तपत्रामधून संपूर्ण भारतासहित जगभरातून या नालायक अमीरवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आता खरेच अमिरने आपला बाद बिस्तरा गुंडाळून पाकिस्तान मध्ये आपले काळे तोंड घेऊन जावे.