Friday, May 3, 2024
Google search engine
Homeसंपादकीयविशेष लेखवाहतुकीच्या कोंडीवर उपाय काय?

वाहतुकीच्या कोंडीवर उपाय काय?

देशात खासगी वाहनांची संख्या कमालीची वाढली असून, रस्त्यांची अपुरी संख्या, कमी विस्तार यामुळे दररोज वाहतुकीच्या कोंडीला सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. या समस्येवर मेट्रो तसेच भूमिगत रेल्वे हाच एकमेव उपाय आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.

आपल्या देशात वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. देशातील लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. कार, दुचाकी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. लांब अंतरावरून कामाच्या ठिकाणी जायचे तर नागरिकांना आपले स्वत:चे वाहन असण्याची गरज भासते आहे. याचे कारण म्हणजे सार्वजनिक परिवहन व्यवस्था म्हणजे बसेसचा काहीही उपयोग नसतो. एक तर त्यांची संख्या अपुरी असते आणि वेळेवर त्या मिळत नाहीत. त्यामुळे बसवर अवलंबून राहणे शक्य नसते. रिक्षा, टॅक्सी भाडे देणे परवडत नाही. अशा वेळी स्वत:चे वाहन घेणे हाच एक पर्याय आपल्याजवळ उरतो आणि तेच केले जाते. पण यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते अरुंद आणि व्यवस्थित नाहीत, एकाच रस्त्यावरून सर्वच प्रकारची म्हणजे लहान-मोठी वाहने धावत असतात. बस, ट्रकपासून बैलगाड्या, हातगाड्यांपर्यंत सगळी वाहने एकाच अरुंद रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे आपल्या देशातील वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. पण या समस्येकडे इतर समस्यांकडे केले जाते तसेच दुर्लक्ष केले जात आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना अनेक प्रकारच्या गरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. पण प्रशासनाला त्याची कोणतीही फिकीर नाही.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक आहेत ते रस्ते. रस्ते ही कोणत्याही शहरातील मूलभूत सुविधा आहे. ज्या झपाट्याने शहरे आणि गावांचा विस्तार होत आहे, त्याप्रमाणात मूलभूत सुविधांचा विकास करण्यात आलेला नाही. नगरपालिका, महानगरपालिका यांना कमालीच्या मर्यादा आहेत. त्यांच्या उत्पन्नाची साधने अतिशय मर्यादित आहेत आणि त्यामुळे या सुविधा निर्माण करणे त्यांना अशक्य होत आहे. स्वाभाविकच नागरिकांना कमालीच्या गरसोयी सोसाव्या लागतात. रस्ते हाही घटक त्यातलाच एक आहे. रस्त्यांचा विकास जेथे झाला आहे तेथेही तो व्यवस्थित अभ्यास करून केलेला नाही. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न तसाच राहिला आहे.

रस्ता बांधताना किंवा त्याचा विस्तार करताना त्या रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनांचे प्रकार आणि पादचारी या दोन्हींचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या देशात मोठ्या शहरांमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर पादचा-यांनी चालण्याची सोयच राहिलेली नाही. त्यांना चालण्यासाठी फुटपाथ बांधलेला असलाच तर त्यावर हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केलेले असते. जिथे फुटपाथ नसतात, तेथे रस्त्याच्या कडेला हे हातगाडीवाले उभे असतात. त्यात जर खाद्यपदार्थाच्या गाड्या असतील तर विचारायलाच नको. त्या गाडीभोवती खाद्यपदार्थासाठी झुंबड उडालेली असते आणि इकडे वाहने पुढे जाण्याच्या प्रतीक्षेत उभी आहेत, याचे भानही खाणा-यांना नसते. ज्या रस्त्यांवर वाहनांची कमालीची गर्दी आणि ये-जा असते अशा ठिकाणी हातगाडीवाल्यांना उभे राहू द्यायचे नाही, हे पथ्य प्रशासनाने पाळले तर ही वाहतुकीची समस्या ब-याच अंशी कमी होईल. कारण या लोकांनी रस्त्याचा मोठा भाग अडवलेला असतो. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अतिशय अडचण निर्माण होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला विविध वाहने वाट्टेल तशी पार्क केलेली असतात. त्यामुळेही वाहतुकीला अडचण निर्माण होते.

वाहनधारकांनी रस्त्यावरून जाताना थोडी जरी शिस्त पाळली तरी अनेक समस्या सुटतील. हे खरे असले तरी वाहतुकीची समस्या मुळात निर्माण झाली आहे, ती वाहनांची संख्या कमालीची वाढल्याने. वाहनांची संख्या जर कमी झाली तरी वाहतुकीच्या समस्येचे निवारण होईल. यासाठी अर्थातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय मजबूत करावी लागणार आहे. बहुतेक आशियाई देशांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी याच पर्यायावर अवलंब केला आहे. त्यांच्या वाहतूक व्यवस्थेवर लक्ष टाकल्यास त्यातून आपल्या देशातही अशा प्रकारे व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे, हे सहज लक्षात येते.

हाँगकाँग हे आशियातील सर्वात प्रगत शहरांपैकी आहे. या शहरात राहणा-या माणसांना आपले एखादे वाहन असावे, अशी निकड कधी भासत नाही. याचे कारण म्हणजे तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय मजबूत आणि विकसित आहे. तेथील सबवे ट्रेन्स आणि बसेस या जनसामान्यांच्या सवयीच्या आहेत. अर्थात इतर शहरांप्रमाणे तेथेही मिनीबसेस, टॅक्सी आहेत. पण सार्वजनिक वाहतुकीचा बराचसा भार उचलते ती मास ट्रान्झिट रेल्वे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न ब-याच अंशी सुटतो.

कोणत्याही शहरात कुठेही ये-जा करताना लोकांना, अगदी त्यांचे स्वत:चे वाहन नसले तरी समस्या येता कामा नये. यावरूनच ते शहर राहण्यास योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. पाच मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठीही जर गर्दी आणि ट्रॅफिकमुळे पंधरा किंवा वीस मिनिटे लागणार असतील तर तेथील स्थिती किती बिकट आहे, हेच यातून दिसून येते. सिंगापूरमध्येही या समस्येची सोडवणूक करण्यासाठीच तर सबवेचे जाळे सगळीकडे पसरले आहे.

शहरांमध्ये राहणे सुसह्य व्हावे यासाठी बहुतेक आशियाई देशांची सरकारे शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक प्रबळ करण्याचा आणि विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करणे म्हणजे रस्त्यावर केवळ बसेस, टॅक्सी किंवा ऑटोरिक्षांची संख्या वाढवणे नाही. हे एवढेच करणे पुरेसे असते तर भारतातील सगळी महानगरे जगातील अव्वल दर्जाची शहरे बनली असती. पण तशी ती नाहीत आणि वाहतुकीच्या समस्येच्या गत्रेत ती पूर्णपणे अडकली आहेत. म्हणूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वव्यापी आणि जलद असायला हवी. तीही जर रस्त्याच्या खालून असेल तर त्यातून वाहतुकीची समस्या निर्माणच होणार नाही.

मलेशियाची राजधानी कौलालंपूर येथील क्लँग व्हॅलीतील वाहतूक व्यवस्था अशा त-हेनेच विकसित होत आहे. तेथील बसेसचा मार्ग कमी गर्दीच्या रस्त्यांवर बदलण्यात येत आहे, रेल्वेचे नेटवर्क अधिक विस्तारण्यात येत आहे.

बसेस, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा यापेक्षा रेल्वे हा वाहतुकीचा सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे. याचे कारण म्हणजे रस्त्यांवरून धावणा-या वाहनांत प्रवाशांची संख्या मर्यादित असते आणि त्यामुळे स्वाभाविकच वाहनांची संख्या वाढवावी लागते. मात्र रेल्वेचे तसे नाही. रेल्वेतून एकावेळी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू शकतात आणि रेल्वेचा मार्गच वेगळा असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यासाठीच देशातील मोठ्या शहरांत मेट्रोचे जाळे वाढणे आवश्यक आहे. आशियाई देशांतही याच पर्यायाचा जास्त करून विचार केला जातो. चीनमध्ये तर अकरा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यात आले आहे. आपल्या देशात अजूनही विकसित शहरांमध्येही मेट्रो किंवा सबवे रेल्वेच्या पर्यायाचा विचार केलेला नाही. कोलकाता आणि दिल्ली वगळता इतर शहरांत मेट्रो नाही. मुंबईत लोकल ट्रेन्सचे जाळे चांगले आणि प्रभावी आहे. पण त्याचा विस्तार आणि विकास झालेला नाही. त्यामुळे आहे त्या रेल्वे ट्रॅफिकवर गर्दीचा ताण पडतो आहे.

आपल्या देशात गरज आहे ती विकासाच्या कल्पना स्पष्ट असलेल्या नेत्यांची आणि अभियंत्यांची. प्रत्येक बाबतीत राजकारणाचाच विचार करणा-या आपल्या देशात मूलभूत सुविधा पुरवतानाही राजकारण केले जाते. परिणामी सर्वसामान्यांचे हाल नित्याचे झाले आहेत. रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचे जाळे वाढवले तर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी संपण्याची शक्यता निर्माण होईल.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट