कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे करणा-या भयानक अशा अमानुष घटनेचे तीव्र पडसाद विधानमंडळात मंगळवारी दोन्ही सभागृहात जोरदारपणे उमटले.
मुंबई- कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे करणा-या भयानक अशा अमानुष घटनेचे तीव्र पडसाद विधानमंडळात मंगळवारी दोन्ही सभागृहात जोरदारपणे उमटले. राज्य चालवता न येणा-या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी जोरदारपणे केली तर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली.
विधान परिषदेत नारायण राणे यांच्या भाषणाने सभागृह दणाणून गेले. नारायण राणे यांचे भाषण ऐकण्याकरिता आमदार कक्ष आणि प्रेक्षक कक्ष तुडुंब भरलेला होता. धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊन चर्चेची सुरुवात करताना नारायण राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील माय-भगिनींचे संरक्षण करता येत नसेल, सामान्य माणसाला सुरक्षित वाटत नसेल तर गृहखाते तुम्ही ठेवता कशा करता? गृहखात्याचा अर्थ समजला आहे का? या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच राहिलेली नाही.
जनतेचे संरक्षण तुम्हाला करता येत नाही, म्हणून मुख्यमंत्रीपदाचा आवाका नसलेले मुख्यमंत्रीपद सोडून राजीनामा देऊन मोकळे व्हा, अशा सणसणीत शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मंगळवारी विधान परिषदेत फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात १५ वर्षाच्या मुलीवर ४ नराधमांनी बलात्कार करून तिचे हात-पाय तोडले. या भीषण हत्येने संतप्त झालेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना नियम ९७अन्वये विरोधी पक्षाने चर्चा उपस्थित करून मोकळय़ा केल्या. या चर्चेमध्ये भाग घेताना नारायण राणे यांनी ४०-४५ मिनिटे जोरदार हल्ला करून सरकारची पिसेच काढली.
या गंभीर चर्चेला सुरुवात झाली तेव्हा सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर नव्हते. विधान परिषद सभागृहाचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच सभागृहात उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण चर्चेला उत्तर कोण देणार? असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला तेव्हा दुस-या बाकावर बसलेले गृहराज्यमंत्री केसरकर बसूनच म्हणाले, ‘मी उत्तर देणार’ त्यावर नारायण राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला..
या सभागृहात राज्यमंत्र्याचे उत्तर चालणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिले पाहिजे आणि ते कनिष्ठ सभागृहात असतील तर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उत्तर द्यावे. मात्र राज्यमंत्र्याला आम्ही बोलू देणार नाही. नारायण राणे यांच्या मागणीला विधान परिषदेतील सर्व विरोधी सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला.
आमदार भाई जगताप, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, सुनील तटकरे या सर्वानी राज्यमंत्र्यांचे उत्तर चालणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन आपल्या जागेवर बसून बोलत असताना नारायण राणे यांनी त्यांना स्पष्टपणे सुनावले की, खाली बसून बोलता येणार नाही. सभापतींची परवानगी घेऊन तुम्ही आपले म्हणणे मांडा.
यानंतर सत्ताधारी पक्षातील मंत्री शिवतारे हे जोरजोरात अंगावर येऊन ओरडू लागले तेव्हा सारे विरोधी पक्ष एकत्र येऊन सभागृहात काहीसा तणाव निर्माण झाला. आमदार किरण पावसकर हे तर आपल्या जागेवरून धावत जाऊन राज्यमंत्री शिवतारे यांच्याशी हुज्जत घालत होते. सभापती तालिकेवरील निरंजन डावखरे यांनी सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली. नंतर सभापती रामराजे निंबाळकर पीठासीन अधिकारी म्हणून बसले आणि श्री. राणे यांचे भाषण सुरू झाले. राणे यांच्या भाषणावेळी विधानसभेतील आमदारांनी आमदार कक्षात गर्दी केली होती.
राणे भाषणात म्हणाले की, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या या ठरावावर मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. सर्वकाही अधिकाऱ्यांवर सोपवून ते मोकळे झाले आहेत. सरकार सांगते की, आरोपी पकडला गेला, पण पोलिसांनी नव्हे तर लोकांनीच त्या नराधमाला अटक केली आहे. याउलट फडणवीस सरकारचे पोलीस मृत मुलीच्या मृत्यूची तक्रार करणा-या तिच्या पालकांना सांगतात की, ‘तुम्ही तक्रार केली तर तुमच्या विरोधातही तक्रार येऊ शकते’.
राणे पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्यात २० हजार गुन्हे घडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे राज्य पंढरपूरच्या विठोबाच्या स्वाधीन केलेले आहे. मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात. या राज्याचा जी.डी.पी. वाढला का? कुपोषण थांबले का? गुन्हेगारीत घट झाली का? या राज्यात बलात्कार करण्याची हिंमत होऊ नये यासाठी काय कठोर कारवाई करणार? दोन वर्षात तुम्ही काय दिवे लावलेत?
नारायण राणे म्हणाले की, हे सरकार कुणाला इन्कम टॅक्सची भीती दाखवते, कुणाला गुंडगिरीच्या बळावर धमकावले जाते, मी ज्या चेंबूरमध्ये राहात होतो, तिथले भाजपाचे आमदार हशू अडवाणी होते, डॉ. मुजुमदार होते, या सभागृहाने वाजपेयी- अडवाणी यांना पाहिले आहे. आता तशी माणसे नाहीत.
माझ्याविरोधात पहिल्याच दिवशी बातम्या छापून आणल्या जातात, माझे तोंड गप्प करावे याकरिता. पण मी गप्प बसणारा नाही. धमक्यांना मी भीत नाही. अटकेला भीत नाही, अशा धमक्यांनी नारायण राणे गप्प बसेल, असे समजू नका.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच एका महिलेचा विनयभंग करतो, अशी तक्रार दुस-या मंत्र्याकडे येते असा स्पष्ट आरोप नारायण राणे यांनी केला तेव्हा राणे यांच्या या जोरदार आरोपाला रोखण्याचा प्रयत्न काही आमदारांनी केला तेव्हा राणे ताड्कन म्हणाले की, ‘मंत्र्याचे नाव सांगू का?’ या टोकदार प्रश्नानंतर भाजपाचे सगळे आमदार एका क्षणात गप्प झाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अशा अतिशय प्रखर शब्दांत हल्ला करताना नारायण राणे म्हणाले की, कर्जतची घटना अत्यंत भयावह आहे. पण या सरकारकडे संवेदना अजिबात नाही. हे आजचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात जेव्हा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे बोट करून ते म्हणत होते की, ‘या राज्यात मुख्यमंत्री आत्महत्या करत आहे.. ही आत्महत्या नसून मुख्यमंत्र्यांनी केलेले हे खून आहेत’.
आज आता आम्ही काय म्हणावे.’ ठीक आहे तुम्ही मुख्यमंत्री झालात. पक्षाच्या आशीर्वादाने झालात. मात्र मुख्यमंत्र्यांना कारभार हाताळणे, जनतेला विश्वास देणे, जनतेचे संरक्षण करणे हे तुम्हाला जमत नाही, तेव्हा तुम्ही घरी बसा.
दिल्लीला जाता, भाषणे करता, पंढरपूरला जाता, मेजवानीला जाता आणि कर्जत येथील भीषण घटनेतील मृत मुलीच्या कुटुबीयांना भेटायला तुम्हाला वेळ नाही, असा आक्षेप घेऊन नारायण राणे म्हणाले की, या राज्याला तीन मुख्यमंत्री आहेत. एक देवेंद्र फडणवीस, दोन त्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, तिसरे प्रवीण दराडे राज्याचा सगळा कारभार प्रवीण परदेशी चालवत आहेत. त्यामुळे कोणावरही कोणाचा धाक राहिलेला नाही.
प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते धनंजय मुडे म्हणाले की, निरपराध मुलीच्या हत्येनंतर आठवडा उलटून गेला तरी मुख्यमंत्री घटनास्थळी भेट देत नाहीत, ती शेतक-याची मुलगी होती. मुंबईची मुलगी नव्हती. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे चार नराधमांनी त्या मुलीचे लचके तोडले. त्या मुलीची आई या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना म्हणाली की, तुमच्याकडून आम्हाला कसलाही न्याय नको आहे.
मात्र तुमच्या मुलीच्या बाबतीत असे घडू नये. या भीषण घटनेतील आरोपींना राजकीय आश्रय आहे, असे सांगून धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर उद्या जनताच कायदा हातात घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. विधान परिषदेत चर्चेला मुख्यमंत्री बुधवारी उत्तर देतील.
गुंडांचा पक्ष म्हणजे भा.ज.पा.
‘गुंडांचा पक्ष म्हणजे भा.ज.पा.’ असा हल्ला चढवून नारायण राणे म्हणाले की, नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ खून होतो, भा. ज. यु. मो.चा सुमित ठाकूर आज मोक्का लावून तुरुंगात ठेवावा लागला. गडकरींच्या मेव्हण्याच्या घरी चोरी झाली. नागपूर आणि जळगावचे भाजपाचे सगळे पदाधिकारी गुंड आहेत. मुन्ना यादव कोण आहे? त्याला महामंडळावर घेतले आहे. त्याच्यावर २६ गुन्हे दाखल आहेत.
राणे,मुंडे,विखे पाटील,चव्हाण,,शिंदे,तटकरे इ नररत्न(?)यांनी आपल्या पायाखाली काय जळत ते पहावे,आत्मा,लाज,हे शब्द अगदी घरादाराच्या वेशीवर टांगलेले दिसत आहेत,काल पासून सुद्धा भ्रष्टाचाराचा मुद्दा परत एकदा पुढे आलेला आहे,मागच्या आठवड्यात धनंजय मुंडे आरोपीच्या यादीत होते,जयंत पाटील LOTTERY घोटाळा,पवार,तटकरे आणि इतर सिंचन घोटाळा,चव्हाण,शिंदे आदर्श घोटाळा,विखे पाटील प्रवरानगर MSEB घोटाळा आणि न जाने असे किती घोटाळे केंद्रात UPA ने आणि राज्यात आघाडी ने केले आहेत,त्याबद्दल आधी बोला शिक्षा भोग,लुटलेले पैसे परत करा मगच BJP मोदींना बोलण्याचा अधिकार या भ्रष्ट लोकांना प्राप्त होईल आणि बाकीचे सुद्धा काही नतदृष्ट लोक जे NDA विरुध्द बोलतात ते गेल्या 15वर्षातला कारभार विसरले कि काय?आणीबाणी त्यांनी केलेली महगाई लाचखोरी वाढवली भ्रष्टाचाराला शिष्टाचार केला,नेहरू ने POK जो भारताचा आहे तो पाकला दिला,इ अनेक मुद्दे,हे पशु जर सत्तेवर आले तर देव सुद्धा भारताचे रक्षण करू शकणार नाही.
कोपर्डी येथे घडलेली घटना खूप वाईट आहे,त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत पण अजितदादा तुम्हालाहि लाज वाटते मग या काही घटना 1)पनवेलला तुमच्या सत्तेत करंजुले या माणसाने मंदबुद्धी मुलीवर अत्याचार केले,त्याला काय शिक्षा झाली? 2)खैरलांजी प्रकरण यामध्ये बलात्कार आणि खून दोनी झाले त्या आरोपींना तुम्ही केव्हा पकडलेत,कि पकडलेच नाही, 3)धरणात पाणी नाही म्हणून तुम्ही वेगळ्या पद्धतीने धरण भरणार होतात! 4)शक्ती मिल कंपनीत तुरुणीवर अत्याचार झाला तो हि तुमच्या काळात 5)फक्त सिंचन घोटाळ्यातच कित्येक हजारो कोटींची रक्कम खाल्ली गेली,75 पासूनचे धरण अपूर्ण आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरु केल्या 2003 पासून तुमच्या काकांच्या कृपेने 6)आव्हाड,दोनी चव्हाण,तुम्ही काका पुतण्या ,तटकरे राणे,शिंदे,भुजबळ,सुळे,चित्रा वाघ यांचे पती,भास्कर जाधव,इ माणसांची यादी संपणार नाही अशी वादग्रस्त भ्रष्ट माणसे तुमच्या आणि कॉंग्रेस पक्षात आहेत आणि काही आघाडी सरकार मध्ये मंत्री होते 7)निर्भया प्रकरणाच्या वेळी तिचे नाव संसदेत सांगितले होते,8)तेलगीने नार्को टेस्ट मध्ये तुमच्या काकांचे तथाकथित जाणता राजा ,भुजबळ,देशमुख इ नाव गुन्हेगार म्हणून घेतले होते तो हि घोटाळा हजारो कोटींचा होता,
अशा कितीतरी घटना ज्यामध्येहि तुम्हाला लाज वाटायला हवी होती,नाना पाटेकर नी तुम्हाला सात्विक म्हटल्यामुळे तुम्हाला लाज वाटायला लागली म्हणून तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून दिली,सत्ते पासून दूर गेल्यामुळे तुम्ही जळत आहात म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण आणता,त्य कुटुंबा बद्दल तुम्ही ,मुंडे,विखे पाटील इ काहीहि वाटत नाही,मालिके मध्ये दु:ख CASH करतात तशी तुम्ही हि दु:खे सत्तेसाठी CASH करत आहात,खरी लाज वाटून माणुसकी बाळगता आली तर पहा.
माननीय जितेंद्र जी आमचे दादा माननीय नारायण राव राणे यांचे कटाक्षाने वाचावे,त्यांनि केलेल्या भाषणात त्यांचा अभ्यास तपासावा, काय बोलले दादा माझ्या शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक राज्यात अशी लाजिरवानी आणि कलंकित गोष्ट घडली हि एक लाजिरवाणी घटना आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडवणीस यांनी तातडीने निर्णय घेणे आवश्यक होता, किमान एक संवेदना म्हणून तरी त्या मुलीच्या घरी जाऊन एक मदतीची हाक देणे आवश्यक होता, मराठ्यांचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र कुठे कमी पडला याचा त्यांनी विचार करावा, मी कोणत्याही पक्षाची बाजू मांडत नाही परंतु हि वस्तुस्थिती आहे, मुंख्यमंत्री साहेब दादांच्या या भाषणावर प्रतिक्रिया देतात कि त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, माननिय मुख्यमंत्री महोदय आपणास सांगू इच्छितो कि आपल्या पक्षात काँगेस राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी तसेच अनेक गुन्हे दाखल झालेले नेते आहेत, ज्यांचा उल्लेख जरी दादांनी टाळला असला तरी ती खरी वस्तुस्थिती आहे, भाषणात राज्यविषयीची असलेली दादांची तळमळ लक्ष्यात घ्या, राजकारणी असताना पण माणूस म्हणून आपण जगतोय याचे भान ठेऊन माणुसकीचा एक हात तरी पाठीवर ठेवला असता तरी त्या मुलीच्या आईवडिलांना किमान त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळाला असता, आमच्या कोकणात येऊन एकदा तरी पहा अश्या गुन्हयांवर कडक कारवाईचे आदेश हेच आमच्या कोकणातल्या सर्वच मंत्र्यांकडे असतात, भले तो कोणत्याही पक्षाचा असो, म्हणूनच महाराष्ट्राला कोकणाबद्दल आदर आहे, महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा मी निषेध करतो, आणि अजून एक गोष्ट सत्ताधारी पक्ष यांनी हे लक्षात घ्यावे कि आता तुमच्या चुकीला माफी नाही गेले 20 महिने शांत असणारा सभागृह दादांच्या येण्याने पुन्हा एकदा गर्जणार यात काडीमात्र शंका नाही….