‘सध्या बुलेट ट्रेनची काही गरज नाही, उपलब्ध असलेल्या रेल्वेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे परखड मत ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर- ‘सध्या बुलेट ट्रेनची काही गरज नाही. उपलब्ध असलेल्या रेल्वेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे परखड मत दिल्ली मेट्रो रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे कंपनीला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीधरन हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या देशात बुलेट ट्रेनची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या त्याची गरज नाही,’ असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
नागपूर मेट्रो समोर सध्या मोठे आव्हान आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. प्रकल्पाला उशीर झाला तर प्रत्येक वर्षी प्रकल्प खर्च पाच टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच त्यांनी नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
Yogya suchna she.sarkarne jarur vichar karawa.kendrala yogya salla dhyawa.