राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना, त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यापेक्षा मुख्यमंत्री या मोर्चामुळे दलित समाज घाबरला आहे, असे सांगत मराठा व दलित समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा घणाघात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला.
नाशिक- राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना, त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यापेक्षा मुख्यमंत्री या मोर्चामुळे दलित समाज घाबरला आहे, असे सांगत मराठा व दलित समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा घणाघात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुंडांना हाताशी धरून जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत असून; मुख्यमंत्री मराठाद्वेषी असल्याचा ‘प्रहार’ही त्यांनी या वेळी केला. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते.
मराठा समाजाचे २९ मोर्चे निघालेले असतानाही मुख्यमंत्र्यांना जाग आलेली नाही. अजूनही ते समाजाने चर्चेसाठी पुढे यावे, असे सांगत आहेत. आता पुरे झाल्या चर्चा. निवेदनातून मागण्या पोहोचलेल्या आहेत. त्यावर निर्णय घेऊन मराठा सामाजाला आरक्षण द्या; अन्यथा मोचार्चा उद्रेक होईल, असा इशारा आमदार राणे यांनी दिला.
समाजाची अस्वस्थता मोचार्तून व्यक्त होत असताना मुख्यमंत्री वेळकाढू धोरण राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ए दिल मुश्किल’ची मांडवली करण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ मिळतो आणि मराठा समाजाच्या मागण्या सोडवण्यास वेळ नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघत असताना, या मोर्चामुळे दलित समाज घाबरला असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीच मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करत आहेत. गुंडांना हाताशी धरून भाजप व संघ जातीय तणाव निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. पत्रकार परिषदेस डॉ. संदीप कोतवाल, करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर उपस्थित होते.
बरोबर आहे साहेब मी तुमाला समर्थन करतो मराठा सामाज्याची तुमि महाराष्ट्रचिं मुलुख मैदान तोफच आहेत