दलित विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकेची झोड उठवली.
नवी दिल्ली- हैदराबाद विद्यापीठातून निलंबित केल्याने दलित विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकेची झोड उठवली.
ही आत्महत्या नसून लोकशाही, सामाजिक न्याय आणि समतेची हत्या आहे. मोदींनी या संदर्भात जबाबदार असणा-या व्यक्तींवर कारवाई करावी आणि संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी केजरीवाल यांनी ट्विटरवरून केली आहे.
हैदराबादमधील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्या केल्याने मला दु:ख झाले आहे. सरकारने या संदर्भात कसून चौकशी करावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी देखील ट्विट केले आहे.
१७ ऑगस्ट २०१५ रोजी विद्यापीठात दलित विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य चार दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. या विद्यार्थ्यांना वसतिगृह, ग्रंथालय आणि विद्यापीठाच्या अन्य ठिकाणी जाण्यास विद्यापीठाने मज्जाव केला होता. या तणावाखाली असलेल्या रोहितने अखेर गळफास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित हा आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील असून, गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद विद्यापीठात समाजशास्त्र विषयात पीएचडी करीत होता. रोहित आंबेडकर युनियनचाही सदस्य होता.
[EPSB]
राहुल गांधी रोहितच्या कुटुंबियांना भेटले
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठातून निलंबित केल्याने आत्महत्या केलेल्या रोहित वेमूला या दलित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.
[/EPSB]
It's not suicide. It's murder. It's murder of democracy, social justice n equality.Modi ji shd sack ministers n aplogoize to the nation(2/2)
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 19, 2016
Modi govt constitutionally duty bound to uplift dalits. Instead Modi ji's ministers got five dalit students ostracised n suspended(1/2)
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 19, 2016
Deeply saddened at the tragic death of Dalit student Rohit Vemula in Hyd. Govt must ensure fair probe & action against those responsible.
— Nitish Kumar (@NitishKumar) January 19, 2016
ह्याला उगीच राजकीय लेप लावणे चुकीचे आहे. राजकीय नेत्यांसारखे खाली पडलेले आजवर कुणीही नाही. लोकांनी संयम ठेवावा आणि पोलिसांना आपले काम करू द्यावे. दोषींना शिक्षा मिळावी, केजरीवाल, नितीश कुमार आणि अन्य नेते हे केवळ सहानभूती मिळवून आपली राजकीय लालसा पूर्ण करणारी मंडळी आहे. लोकांनी ह्यांना ओळखावे.