भारताचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहली भारताच्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकांमधील सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
सिडनी – ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यात नाबाद १४० धावांची खेळी खेळणारा भारताचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहली भारताच्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकांमधील सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
कोहलीने गुरुवारी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला. भारताकडून ऑस्ट्रेलियात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता.
२००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौ-यात राहुल द्रविडने आठ डावांमध्ये मिळून ६१९ धावा केल्या होत्या. कोहलीने गुरुवारी हा विक्रम मोडला. कोहली जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा त्याच्या ४९९ धावा होत्या. आता सात डावांमध्ये मिळून ६३९ धावा त्याच्या खात्यावर जमा आहेत. कोहली नाबाद असल्याने शुक्रवारी या धावसंख्येमध्ये अधिक भर पडू शकते.
३३ वा कसोटी सामना खेळणा-या कोहलीने गुरुवारी मालिकेतील चौथे आणि कारकीर्दीतील दहावे शतक झळकावले. कर्णधार म्हणून पहिल्या डावात सलग तीन शतके झळकवणारा कोहली जगातला पहिला फलंदाज बनला आहे. १९७५ मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधार असताना ग्रेग चॅपल यांनी वेस्ट इंडिज विरुध्द सलग दोन शतके झळकवली होती. सुनिल गावस्कर यांच्यानंतर एकाच मालिकेत चार शतके झळकवणारा कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
सचिन तेडुंलकरने सुध्दा विराट कोहली शतकाचा विक्रम मोडेल असे भाकीत केले होते.तो ज्या प्रमाणे तो खेळत आहे.त्यामुळे हे अशक्य नाही.