कृत्रिमरीत्या आंबा पिकवणा-यांवर अन्न व औषध प्रशासन करडी नजर ठेऊन आहे.
मुंबई- कृत्रिमरीत्या आंबा पिकवणा-यांवर अन्न व औषध प्रशासन करडी नजर ठेऊन आहे. त्यामुळे पाडावर आंबा पिकण्यापूर्वी कच्चा-पक्का असतानाच, त्याच्यावर रासायनिक पावडरचा मारा करून झटपट आंबा पिकवणा-याचा डाव धुळीस मिळणार आहे. नुकतेच प्रशासनाने घाटकोपर परिसरात छापे टाकून कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा जप्त केला आहे.
भारतीय हापूस आंब्यांना युरोपीय बाजारात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना काही व्यापारी कृत्रिमरीत्या आंबे पिकवत आहेत. एफडीएचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कारवाई अपेक्षित होती. निवडणुकीचे काम संपल्यानंतर एफडीएचे अधिकारी पुन्हा सेवेत रुजू झाले.
रुजू झाल्यानंतर त्यांनी घाटकोपर परिसरात छापा टाकून कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा जप्त केला आहे. जप्त केलेल्या आंब्यावर रासायनिक प्रक्रिया केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्याची विक्री करण्यास परवानगी आहे. आंबा कच्चा असताना त्याच्यावर कार्बाइड गॅसचा मारा करून तो पिकवला जातो. या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन आंबे पिकवले जातात. कार्बाइड गॅस शरीराला अपायकारक असतो. काही व्यापारी हे कार्बाइड गॅसचा वापर करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत असतात. याची दखल घेऊन दर वर्षी प्रशासनाच्या वतीने व्यापा-यांची बैठक बोलावली जाते. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ नुसार काबाइड पावडरचा वापर करून आंबा पिकवण्यास प्रतिबंध आहे. असे प्रकार करणा-यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
कसा ओळखावा आंबा?
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याला उग्र वास येतो. तसेच या आंब्याचा काही भाग पांढरा होत असतो. जर असा पांढरा रंग आल्यास त्यावर कार्बाइड गॅसचा मारा केला हे सिद्ध होते. तसेच आंब्याची चवही बिघडते.
शहर . नीलंगा जीला.लातूर या ठीकानी कारपेट ने अंबे पीकवतात नीलंगा शहरातील नागरीका च्या जीवनाशी खेळला जात आहे