सोलापुरमधील करमाळा तालुक्यातील कोर्टी गावातील शाळेत मध्यान्ह भोजनातून अडीचशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली.
करमाळा- सोलापुरातील कोर्टी (ता. करमाळा) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला. विषबाधा झालेल्यांपैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजता मध्यान्ह भोजन देण्यात आले. मात्र अर्ध्या तासातच विद्यार्थ्यांना उलटय़ा व जुलाब सुरू झाले. काही विद्यार्थ्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे शाळेत एकच हाहाकार उडाला. कोर्टीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची माहिती वा-यासारखी पसरली. त्यामुळे पालकांनी दवाखान्यात धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला. ही माहिती कळताच करमाळा पंचायत समितीचे सदस्य संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोर्टीच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार झाल्यानंतर अधिक उपचारासाठी विद्यार्थ्यांना कुटिर रुग्णालयात हलवण्यात आले. यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
योजना बंद करा मोदी साहेब ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल्या देशातील भावी मतदारांना इतके गरीब समजू नका कि ते शाळेतील असे अन्न खून जगू शकतात ,,,,,,,,,,,,,,,,त्यांचे आये बाप त्यांना पोसायला जिवंत आहे अजून ,,,,,,,,,,,,,