येत्या सोमवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात जणू भूकंप झाला आहे.
मुंबई- येत्या सोमवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात जणू भूकंप झाला आहे. गेले काही दिवस यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, सोमवार, दिनांक २५ जुलै रोजी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहोत, असे खुद्द नारायण राणे यांनीच गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली. राजीनाम्यामागील भूमिका सोमवारीच ‘ज्ञानेश्वरी’वर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले.
कोकणातील आपल्या सर्व चाहत्यांना वैयक्तीकरित्या भेटण्यासाठी शुक्रवारपासून नारायण राणे यांचा झंझावाती दौरा सुरू होत आहे. सकाळी सात वाजता सडकमार्गे त्यांचा दौरा सुरू होणार असून नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी असा प्रवास करीत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत ते रात्री कणकवली येथे पोहचणार आहेत.
या दौ-यादरम्यान प्रत्येक प्रमुख ठिकाणी थांबून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शनिवार, दिनांक १९ जुलै रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. रविवार, दिनांक २० जुलै रोजी दुपारी १२ ते ३ या कालावधीत सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन होणार आहे. या स्नेहसंमेलनाला राणे उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या दौऱ्याहून मुंबईत परतल्यावर सोमवारी राणे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदे मला भूषविता आली. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला. महाराष्ट्र विधिमंडळातही मी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विधानसभा अध्यक्षपद सोडले तर मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, विरोधी पक्षनेता ही सर्व पदे मला मिळाली म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो. असे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येते, असेही ते म्हणाले.
कोकणातील कार्यकर्त्यांना भेटून आपण सोमवारी मुंबईत परतणार आहोत. त्यानंतर आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना सादर करू. त्याच दिवशी हा राजीनामा का दिला, याबाबतची भूमिका आपण जाहीरपणे मांडणार आहोत, असेही राणे यांनी पत्रकारांना सांगितले.
दि एकदाचो राजीनामो आनी हो मोकलो. कित्या गरीबांका शेंदिये लायतय.लोकांनी झिलाक भायरो केलो आता तुकाय कांदो लायतले. आता निवडणुकीनंतर दोघ्यान्का जोताक लाय आनी पाठसून तू नांगर धर.बघ शेती जमत काय.नाय तर फकांदा मारीत बस.
अरे मूर्ख माणसा तू कोणाला सांगतोस हे सर्व. तुझ्या बापाला आणि आई ला सांग नांगर पकडायला.
दादा तुमचा निर्णय कायपण असुद्या आम्हाला तो मान्य.
माननीय. श्री राणे साहेब तुम्ही जो निर्णय घेतला असेल तर तो उचितच असणार.
साहेब आम्हाला गर्व आहे तुमचा कि आम्ही आपले कार्यकर्ते आहोत म्हणून. साहेब मी स्वत:हा आणि माझे कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या सोबत आहे आणि शेवट पर्यंत राहणार.साहेब एकाच सांगतो कोकणचा कोणी विकास केला तो केवळ तुमच्या प्रयत्नांनीच झाला आहे.
कोकणातल्या माणसांन एकाच विचारतो , इंगीनिरंग कॉलेज, शाळा, शेतकारांसाठी अनेक सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, बांधकाम हे कस सिद्ध झाल तर राणे साहेबांमुळेच . कोकणी माणसांनी एवढा लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतला आहे. मुंबईत मराठ्यांना वडापाव आणि मारामारी करायला लावणारेच पक्ष घ्या हुरावर बसवून. आता मुंबईला धंद्याला लावली ,आता कोकणाची बारी.!
राणे साहेब तुमच्या कुठल्या हि निर्णयासाठी नेहमी तयार आहे, असणार आणि राहणार….!
‘बस फक्त पाटीवर हात ठेऊन लढ म्हणा’…..!
जय महाराष्ट्र
सिद्धेश ता. बावकर
शिवडी-परेल