क्रीडा खात्याविरुध्दची न्यायालयीन लढाई जिंकला असून, क्रीडा मंत्रालयाने मनोजला क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणा-या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्याच मान्य केले आहे.
नवी दिल्ली – भारताचा आघाडीचा बॉक्सर मनोज कुमार अखेर क्रीडा खात्याविरुध्दची न्यायालयीन लढाई जिंकला असून, क्रीडा मंत्रालयाने मनोजला क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणा-या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्याच मान्य केले आहे.
यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी आपल्याऐवजी जय भगवानच्या नावाची शिफारस झाल्याचे समजल्यानंतर मनोजने क्रीडा खात्यातील अधिका-यांची भेट घेतली.
त्यावेळी अधिका-यांनी अर्जुन पुरस्काराच्या १५ खेळाडूंच्या यादीमध्ये तुझे नावे येईल असे मनोजला आश्वासन दिले. मात्र पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या यादीमध्ये नाव नसल्याचे समजल्यानंतर मनोजने क्रीडा खात्याच्या निर्णयाविरुध्द दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला.
न्यायालयात सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी सांगितले कि, मनोज डोपिंग प्रकरणात अडकला असल्याचा निवड समितीचा गैरसमज झाला त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्या नावाचा विचार झाला नाही. क्रीडा खाते मनोजला अर्जुन पुरस्काराने गौरवणार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
जय भगवानपेक्षा सरस कामगिरी असूनही अर्जुन पुरस्कारासाठी डावलण्यात आल्याने, मनोज कुमारने क्रीडा खात्याकडे दाद मागितली होती. २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनोजकुमारने सुवर्णपदक मिळवले होते. बुधवारी सकाळी मनोजला पुरस्कार मिळणार असल्याच्या निर्णयाची माहिती मिळाली. दक्षिणकोरियामध्ये होत असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये मनोजकुमार भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे.
क्रीडा खात्याला चांगलाच “ठोसा “लागव्लास रे बाबा तू ! जय हो मनोजकुमार कि !!