मुंबईत दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण वाढत आहे. येथील वाढत्या आवाजाच्या पातळीवर निर्बंध घालण्यात एकूणच व्यवस्थापनेला यश आलेले नाही.
मुंबई- मुंबईत दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण वाढत आहे. येथील वाढत्या आवाजाच्या पातळीवर निर्बंध घालण्यात एकूणच व्यवस्थापनेला यश आलेले नाही. त्यामुळे शाळा, कॉलेज, मैदान, मंडई, रस्त्यांवरील सिग्नल आदी ठिकाणी वाहनांचे हॉर्न, लाऊडस्पीकर तसेच अन्य कारणांमुळे होणा-या गोंगाटामुळे होणा-या ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी मुंबईतील १२०० ठिकाणे निश्चित करून त्या भागातील ध्वनीचा अभ्यास करून ती कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे.
मुंबई हे जागतिक कीर्तीचे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे या शहरामध्ये लोकांचा वाढता लोंढा आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्याही अधिक वाढत आहे. त्यामुळे हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाने अनावश्यक ध्वनिप्रदूषण होत आहे. प्रमुख सिग्नलसह वाहतूक कोंडी झाल्यास गाडीचा हॉर्न वाजवला जातो. त्यामुळे अधिक ध्वनिप्रदूषण होते. याशिवाय मुंबईतील उद्योगधंदे, कायमस्वरूपी लावले जाणारे लाऊडस्पीकर, खेळाची मैदाने, क्रीडांगणे, शाळा, कॉलेज, रुग्णालय, रेल्वे स्थानके यांसह विविध सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गोंगाटामुळे आवाजाची पातळी वाढून ध्वनिप्रदूषण होते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाने ठरवलेल्या मानकाच्या तुलनेत सध्या निवासी, व्यापारी व शांतता विभागातही ध्वनीचे प्रदूषण अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे आवाजाची पातळी जास्त असलेली १२०० ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणच्या आवाजाचे मूल्यमापन करण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यात आली आहे. पीएनएससीओ-स्कायलॅब कन्सॉर्शियम या कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली असून ही कंपनी सर्व विभागात शास्त्रीय अभ्यास करून ध्वनिप्रदूषणाबाबत अहवाल सादर करील. यासाठी सल्लागाराला ७७ लाख रुपये अदा केले जाणार आहे. प्रदूषणाच्या पातळीचे मोजमाप करणे व ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यासाठी या सल्लागाराची नेमणूक करण्यात येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शहर पातळीवर हा पहिलाच प्रयत्न केला जात असून देशात प्रथमच मुंबईने यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर येत्या एक वर्षात ही सल्लागार कंपनी १२०० ठिकाणचा शास्त्रीय अभ्यास करणार आहे. यामध्ये आवाजाचे प्रमुख स्रेत काय आहे आणि तेथील ध्वनिप्रदूषण कशा प्रकारे कमी करता येईल यावर उपाययोजना सुचविणार आहे. वाहनांचे हॉर्न वाजवल्यामुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, ते यांच्या अहवालानंतर कमी करता येईल. २०११मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर मुंबईतील ध्वनिप्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे त्यांचे निर्देश होते. त्यानुसार ध्वनिप्रदूषण भविष्यात कशा प्रकारे कमी करता येईल, यासाठी ठोस उपाययोजना हाती असावी. म्हणून सल्लागारांकडून अभ्यास करून याचा अहवाल मागवला असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले. यासाठी संगणक आज्ञावली (कॉम्प्युटर सॉफ्टवेअर) तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील चाळीसारख्या विभागात उगीचच ध्वनी प्रदूषण होतो, एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती आजारी असली, तर मुद्दामून त्याच्या दरवाज्यात कर्कश्य आवाज काढणे,उगीच वायफळ बडबड करणे,अश्या स्त्रिया सापडतात. दिवसभर घरात बसून असणाऱ्या स्त्रिया आजूबाजूच्या व्यक्तिंस कोणत्या प्रकारे त्रास देता येईल? ह्याचा अभ्यासच बहुतेक घरात बसून करीत असाव्यात. पोलिसचौकीत मजबूत पकड आणि विभागात राजकारणी पद मिळाल्याने विभागातील वर्चस्व,ह्यामुळे एखाद्याला भरपूर त्रास जरी दिला, तरी पोलिस चौकी आणि तेथील अधिकारी आमचे काही वाकडे करू शकत नाही, अशा धमक्या स्त्री जातीतील बाया करतात, म्हणजे त्या स्त्रिया आणि त्यांचे पुरुष व कुटुंब कोणत्या प्रकारचे असतील? याचा सामान्यजनाने विचार करावा. प्रत्येक वेळीस पोलिसचौकीत एखादी खोटीतक्रार करून पर पुरुषावर वर्चस्व गाजवणाऱ्या स्त्रिया ज्यांच्या पुरुषांना अशा गोष्टीमुळे मोठेपणा मिळतो,अशावेळेस सामान्य जनतेने काय करावे? कारण एखादा पुरुष एकटा राहतो, हे पाहून त्या स्त्रिया पोलिसचौकीतील ओळखीमुळे त्या पुरुषावर बिनधास्त खोट्या तक्रारी करतात आणि पोलिस चौकीतील अधिकारी हि त्या पुरुषास शिवीगाळ, मारहाण करण्यास कमी करत नाही. उलट तक्रार केलीस तर कोर्टकेस करावी लागेल, अशा धमक्या देऊन ते अधिकारी त्या व्यक्तीकडून फुक्कटचे चार्ज मारत राहतात आणि रात्ररात्रभर पोलिस चौकीत थांबवून ठेवतात.अशा स्त्रियांबद्दल कारवाई करायची असल्यास केंद्रीय प्रदूषणनियंत्रक मंडळाकडून कोणती मदत मिळू शकेल?कारण संपूर्ण पोलिस चौकी आणि अधिकारी त्यांच्याशी सामील. कित्येक वेळेस एखाद्याच्या राहत्या जागा मिळवण्याकरितासुद्धा त्या व्यक्तीस स्त्रिया आणि मुलांच्या सहाय्याने नाहक त्रास देण्याचा गैरप्रकार चालतो. हे सर्व तेथील स्थानिक पोलिस चौकीतील अधिकाऱ्यांस माहित असते. आपल्या कामधंद्याच्या चौकशी तेथील पोलिस अधिकारी करतात, पण त्याच समोरील व्यक्तीच्या कामाधंद्याच्याबद्दल पोलिस अधिकारी कोणतीच माहिती का देत नाही? सकाळी एखाद्या व्यक्तीस कामास जायचे असते आणि रात्र रात्र भर त्याच्या दरवाज्यात गोंधळ घालणे अशा वेळेस पोलिस अधिकारी हि मदत करत नाही, तेव्हा याला राजकारण म्हणायचे, दादागिरी म्हणायचे, कि ती व्यक्ती वेडी आहे असे समजायचे?