वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात जे घडले नाही ते घडले आहे. एका वृत्तपत्राला आपला अग्रलेख मागे घ्यावा लागला आहे. असे कधी घडले नव्हते. अग्रलेख मागे घेत असल्याची जाहिरात करून माफी मागावी लागलेली आहे. वातानुकूलित कार्यालयात बसून चार-दोन पुस्तके वाचून त्यातील संदर्भ देत समाजातील श्रद्धास्थानांची टिंगल करायची भूमिका एकदा घेतली की, अशी पत्रकारिता उघडी पडते. आपण फार शहाणे आहोत, असा समज असलेले संपादक जेव्हा ए. सी. रूममध्ये बसून आपली अक्कल पाजळवत असतात आणि त्यात त्यांना हुशारकी वाटते, अशा संपादकांनी मराठी पत्रकारितेलाही अवमानीत केले आहे. समाजातील श्रद्धास्थानांना धक्का लावण्याचा अधिकार कुणालाही नाही. जे लाखो लोक एखाद्या व्यक्तिमत्त्वाला श्रद्धेच्या पवित्र नात्याने स्वीकारत असतात त्यांच्याबद्दल अत्यंत हीन दर्जाने लेखन करणा-याची कीव करण्याच्या पलीकडचा हा विषय आहे. मदर तेरेसा यांना ‘बाई’ म्हणणे आणि ज्या नागरिकाला वेदना आहेत त्याच्या डोक्यावरून फोटो काढण्यासाठी हात फिरवणारी ही बाई, असले अत्यंत हिडीस उल्लेख करून आपल्या पांडित्यांचे प्रदर्शन करणा-या संपादकांची तारीफ काय करावी? महाराष्ट्रात असा संपादक असावा, हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे दुर्भाग्य मानले पाहिजे. ज्या लोकसत्तेचे संपादकत्व ह. रा. महाजनी, र. ना. लाटे, विद्याधर गोखले, माधव गडकरी अशांनी भूषविले ते आपापल्या परिने विद्वान होते. पण त्यांचा लोकसंपर्क होता. समाजातील आदराची स्थाने कोणती? लोक कोणाला किती मानतात? याचे त्यांना भान होते. त्यामुळे आपण फार शहाणे संपादक आहोत, हे दाखवण्याकरिता त्यांनी कधी विस्तव हातात घेतला नाही. कारण त्यामुळे भाजून जाणार माहीत होते. शिवाय केवळ विद्वत्ता दाखवण्याकरिता नव्हे तर अशा प्रवृत्तीच्या पत्रकारांची मानसिकता विकृतच असते. आणि म्हणून असे पत्रकार आणि संपादक महाराष्ट्रातील कष्टकरी शेतक-याला ‘बळीराजाची बोगस बोंब’ म्हणू शकतात. याच महाशयांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या अकलेचे आणखी एक प्रदर्शन करून महाराष्ट्रातील कष्टक-या शेतक-याला बदनाम केले होते. अनेक दुष्काळ आणि अनेक महापूर याचा सामना करीत ज्या शेतक-यांनी या महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी केले, त्याला बोगस ठरवणे हे या विकृतीचेच लक्षण आहे आणि या विकृतीचा पंचनामा विधानसभेतही केला गेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडले गेलेले नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितल्यानंतर याच महाशयांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या होत्या आणि शेतकरी कर्जबुडवा आहे, असे लिहायलाही कमी केले नाही. आता तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडवणा-या उद्योगपतींच्या विरुद्ध लिहिताना त्यांची दातखिळी बसली आणि तीन लाख कोटी कर्ज बुडेपर्यंत रिझर्व्ह बँकेने कसलीही दखल घेतली नाही, याबद्दल संपादक महाशयांनी गव्हर्नर साहेबांच्या पदरात या कटाचे माप टाकावे, असे त्यांना वाटले नाही.
विकृती जेव्हा माणसाच्या रोमारोमात भिनलेली असते तेव्हा त्याची विद्वत्ता केवळ वाढलेल्या दाढीवर ठरत नाही. तर ती किळसवाणी वाटते. मदर तेरेसा यांना सारे जग अभिवादन करते आणि त्यांच्या सेवाभावी जीवनाबद्दल सगळय़ा जगात आदराने बोलले जाते. त्या मदत तेरेसांचा अत्यंत हीन पद्धतीने उल्लेख करून ज्या संपादकांनी हे लिहिले त्यांची विकृती ही मराठी पत्रकारिता नाही. उलट असले संपादक मराठी पत्रकारितेचा कमीपणा आहे, हे स्पष्टपणे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.
[EPSB]
मदर तेरेसा यांना संत पद देणार
गरीब, रुग्ण व अनाथांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या मदर तेरेसा यांना येत्या ४ सप्टेंबरला ‘संत’ पदाने सन्मानित करण्यात येणार आहे.
[/EPSB]
Girish kuber yaana vatate kee thech sarva-dnyanni aahet. Parantu potatali malmal veloveli tyanchya agralekhamadhun ughad hote. Aav asa aantat ki te phar nishpaksha aahe, parantu jevha RSS virodhi lokanwar teeka karayachi asate tevha tyana phar chev yeto. Modi kimva RSS, BJP yanchyawar teeka kartaana tyana sambhalun gheun, betabetane aani margdarshakachya bhumiketun teeka kartaat. Pan daavya, congress chya babatit matra dandpatta chalvataat. RSS che agent asalyasarkhe lihit astat.
Mother Teresa Saarkhee Rugnaseva RSS ne karayala koni advale hotey kay? Asena ka dharmaprasarane prerit, parantu hindu madhlya koni asli seva karayala koni pudhe aale navhate mhanun Teresanchya seveche mahatwa. Yaanchya dolyavar RSS cha chashma aslyane, tyach zapadband ritine Bhagwat jashi teeka kartaat, tashich teeka kuberhi kartaat.
Agralekh maage ghenyachi historical ghatna mee aataparyant kadhihi baghitali navhatee. Thunkleli Thunki Chatnyachi vel yethun pudhe yevu naye asa dhada tyani ghyawa and lekh/agralekh lihaavet.