या देशात लबाडांची यादी करायची ठरली तर पहिले नाव भाजपाचे टाकावे लागेल. हा पक्षही लबाड आणि या पक्षाचे नेतेही लबाड. नुसता लबाड हा शब्द अपुरा आहे. फसवेगिरी, लुच्चेगिरी, ४२०, अशी सगळी विशेषणे भाजपाच्या नेत्यांना आणि भाजपाच्या सरकारला लागू पडतील, इतके हे अट्टल आहेत. चंबळ खो-यात वावरणारे जे दराडेखोर आहेत, ते तरी कुठेतरी प्रामाणिक असतील. त्यांच्या दरोडेखोरीबद्दल त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी विनोबांसमोर शस्त्रे टाकली होती. म्हणजे त्यांच्या मनातल्या कुठल्या तरी कोप-यात कुठे तरी संवेदना नावाची गोष्ट होती. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांच्या बाबतीत एवढेही म्हणायला जागा नाही, इतकी फसवणूक करून या देशातल्या जनतेच्या मनात आता भाजपा या पक्षाची आणि नेत्यांची प्रतिमा अट्टल लबाड अशी झालेली आहे.
ज्या ‘अच्छे दिन’ची जाहिरात करून मोदी सत्तेवर आले, त्यावेळी ते फसवणूक करीत आहेत, भाजपा फसवणूक करीत आहे, हे सांगणा-यांकडे भारतीय जनतेने लक्ष दिले नाही. एकदा माणूस कैफामध्ये आला की, त्याला बाकी काही सुचत नाही. भारतीय जनतेच्या मनावर एक असे मोहक आवरण मोदींनी टाकले. त्यामुळे जनता फसली. ‘अच्छे दिन, अच्छे दिन’चे नारे लागले आणि भलत्या पक्षाच्या हातात आणि भलत्या नेत्यांच्या हातात हा देश या जनतेने देऊन टाकला.
आता मोदींच्यावतीने कुणी अमित शहा नावाचा माणूस ‘अच्छे दिन’ यायला २५ वर्षे लागतील म्हणून सांगत आहे. कोण आहे अमित शहा? मोदींचा हा पंटर. त्याची सामाजिक लायकी काय? समाजासाठी त्याने काय केलेले आहे? त्याच्यावर कोणते गुन्हे होते? गुजरातमध्ये त्याला प्रवेश करायला बंदी का होती? या माणसाने कोणते समाजकार्य गेल्या २५ वर्षात केले आहे? एका दरोडेखोराला दुसरा दरोडेखोर मिळाला. तसे भाजपामध्ये शहा मिसळले आणि मोदींनी त्यांचे बाहुले म्हणून त्यांना पक्षाचे अध्यक्ष केले.
कशासाठी केले? तर सरकारही आपल्या हातात आणि शहासारखा लोचट माणूसही आपल्या हातात. पक्ष आणि सरकार आपल्या हातात ठेवण्याकरिता मोदींनी शहाला बसवले. मोदींची स्वत:ची हिंमत नाही. ते हे सांगू शकत नाहीत की, अच्छे दिन येणार नाहीत. त्याला २५ वर्षे लागतील. हे मोदींनी सांगून बघावे म्हणजे मग त्यांच्या सभेत जनता काय रौद्र रूप धारण करेल, याची त्यांना कल्पना येईल. किती फसवणूक कराल? किती काळ खोटे बोलाल? स्वत: मोदी ललित मोदी प्रकरणात बोलायला तयार नाहीत. हा ललित मोदी आज ‘वॉन्टेड’ आहे. त्या मोदीला घटनेची शपथ घेतलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री मदत करतात. त्या ललित मोदीला देशाच्या परराष्ट्रमंत्री मदत करतात.
गुन्हेगाराला मदत करणारे सरकारात बसलेले आहेत आणि त्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांना खंत नाही. घटनेची शपथ घेऊन अधिकार ज्यांच्या हातात आहेत, त्यांनी घटनेशी गद्दारी केलेली आहे. त्याबद्दल पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. जे आश्वासन पंतप्रधानांनी एका सभेत नव्हे तर शेकडो सभांमध्ये दिले, त्या ‘अच्छे दिन’ची ऐशीतैशी करून टाकली आणि आता मिजासखोरीने कोण अमित शहा नावाचा माणूस नाकाने कांदे सोलल्यासारखा सांगतो आहे, ‘अच्छे दिन यायला २५ वर्षे लागतील.’ अमित शहा आणि मोदींना हे सांगितले पाहिजे, याचा दुसरा अर्थ असा आहे की, अजून २५ वर्षे सत्ता भाजपाच्या हातात द्या, असा होतो. या देशातल्या लोकांना हे दुधखुळे समजत आहेत.
वाजपेयी पंतप्रधान होते, अडवाणी गृहमंत्री होते. ती सभ्य माणसे आहेत. आताचे सरकार भामटय़ांच्या हातात सापडलेले आहे. त्यामुळे २५ वर्षे अजून हवीत, असे निर्लज्जपणे सांगायला यांना जनाची नाही, मनाचीही लाज वाटत नाही. आपण काल काय बोललो होतो, आज काय बोलत आहोत. आता जेव्हा केव्हा निवडणूक येईल तेव्हा मोदी आणि शहा यांची मिजास लोक उतरवतील; परंतु या देशाला सगळय़ात मोठा धोका असा आहे की, चार वर्षानंतर हे हुकूमशाह मोदी निवडणूकच होऊ नये, अशी भूमिका घेतील. यांच्यामध्ये लोकशाही मानणारा सुतराम कोणी जिवंत नाही. त्यांच्या नसानसात हुकूमशाही आहे. बाकी कोणालाही ते मोजायला तयार नाहीत.
योगा करतील, हातात झाडू घेतील, ही सगळी त्यांची बाह्य रूपे हे जनतेला फसवण्याचे ढोंग आहे आणि अशा या ढोंगाच्या मागे लोक जातात. संताचा आव आणून हजारो लोकांना मोहजाळय़ात ओढणारे नेमके कसे होते, हे अनेक स्वयंघोषित संत तुरुंगात बसल्याने आता उघड झालेले आहे. जाहीर कीर्तन करणारे आतून तमाशावाले आहेत. पण तमाशावाले तरी का म्हणावे? तमाशावाले आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत.
शहा, मोदी कंपनी कोणाशीच प्रामाणिक नाही. ११ लाखांचा सूट घालणारा या देशाचा प्रतिनिधी कसा होऊ शकतो? आणि ‘अच्छे दिन येतील’ असे या देशाला मोदींनी सांगितले होते की, अमित शहांनी सांगितले होते? जर ते मोदींनी सांगितले होते, तर २५ वर्षे अच्छे दिन येणार नाही, हे सांगायचे धाडस मोदींनी दाखवावे. त्याकरिता दलाल पकडण्याची गरज नाही. शहा हा दलाल आहे.
भाजपाशी त्याचे काही घेणे-देणे नाही. कुठे दीनदयाळ उपाध्याय, कुठे वाजपेयी, कुठे अडवाणी. भाजपामधली ती चारित्र्यसंपन्न माणसे आणि त्यांचे राजकीय स्वच्छ जीवन आणि कुठे हे भामटे? कशाशी तुलना तरी होईल का? सच्चे भाजपावाले जे आहेत, यांनाही आपला पक्ष कोणाच्या हातात सापडला, याबद्दल आज पश्चाताप होत आहे. ज्यांनी महाराष्ट्रात टाचा घासून भाजपा वाढवला, ते महाराष्ट्राचे मुंडे असतील, फरांदे असतील, शिवणकर असतील, त्यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढवला. वसंतराव भागवत आणि गं. भा. कानेटकर यांना जे जमले नाही ते या त्रिकुटाने केले. अखिल भारतीय पातळीवर अडवाणी, वाजपेयींना त्याचे मोठे श्रेय आहे आणि आज सत्ता मिळाल्यावर डकैती कोणी केली?
या देशाच्या पंतप्रधानांना हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे की, ‘अच्छे दिन येणार नाहीत,’ हे तुम्ही तुमच्या तोंडाने लोकांना सांगा. अमित शहाच्या तोंडाने सांगून भामटेगिरी करू नका. ज्या तोंडाने तुम्ही ‘अच्छे दिन’ची जाहिरात करत होता आणि लोकांच्या अपेक्षा गगनाला भिडवल्या होत्या त्या लोकांसमोर येऊन मोदींनी लोकांना सांगावे की, ‘अच्छे दिन येऊ शकणार नाहीत.’ परमेश्वर करो आणि मोदींनी निवडणूक जाहीर करो. लोक यांना मनापासून धोपटतील.
अगदी बरोबर…मोदी समर्थकना कुणी तरी आवरा रे