बंगळुरूमध्ये महिलांचा विनयभंग झालेल्या घटनेबाबत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
बंगळुरू- बंगळुरूमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री एका पार्टीत महिलांचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशाला चांगलाच धक्का बसला. या घटनेबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
‘आजच्या मॉर्डन युगात महिला जितके शॉर्ट कपडे घालतात, ती महिला जेवढी नग्न दिसते, तितके त्या महिलेला फॅशनेबल म्हटले जाते,’ असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझामी यांनी केल्याचे एकच खळबळ उडाली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, ‘जर माझी बहिण-मुलगी सुर्य मावळल्यानंतर ३१ डिसेंबर साजरा करायला जाते आणि तिच्यासोबत तिचा भाऊ किंवा पती नसेल तर हे ठीक नाही.’
‘जर कुठे पेट्रोल असेल तर आग लागणारच, साखर असेल तिथे मुंग्या येणारच.. या विधानानंतर अनेकजण माझ्यावर नाराजी व्यक्त करतील, पण हे वास्तव आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यापुर्वी, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी ‘हे चांगले नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही. तसेच पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनी पाश्चात्यांचे अनुकरण केले होते. केवळ विचारांचेच नव्हे, तर पोषाखांचेही,’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
अबू आझमी हे समाजवादी नसून कट्टर मुस्लिम हाहेत त्यांनी भारतात राहण्यापेक्षा सौदी मध्ये जाऊन राहावे जिथे त्यांना मानसिक समाधान मिळेल