मी, जय भीम काल बोलत होते, आजही बोलत आहे आणि उद्याही बोलेन, मला जय भीम बोलण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड विधानसभेत कडाडल्या.
मुंबई- मी, जय भीम काल बोलत होते, आजही बोलत आहे आणि उद्याही बोलेन, मला जय भीम बोलण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड विधानसभेत कडाडल्या.
विधानसभेत अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या घोटाळाप्रकरणी लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरू होती. तेव्हा ‘काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करत होते. बघा, गोरगरीब दलितांच्या पैशाचे काय झाले.’ अशी शेरेबाजी सत्ताधारी बाकांवरून सुरू होती. त्याचवेळी भाजपाचे सदस्य योगेश सागर आपल्या जागेवर बसून ‘वर्षाताई फार जोरात जय भीम बोलत होत्या.’ अशी शेरेबाजी केली.
तेव्हा गायकवाड संतापल्या. त्या म्हणाल्या की, ‘कुणी काही गडबड केली असेल त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचे असेल ते बोला. परंतु माझा त्या गोष्टीशी काय संबंध आहे, वारंवार अशी शेरेबाजी का केली जात आहे? मी दोन वेळा गप्प बसले. तिस-यांदा माझे नाव घेऊन अशी शेरेबाजी झाली आहे.
मी या ठिकाणी सांगू इच्छिते, होय, मी काल जय भीम बोलले, आजही बोलले आणि उद्याही बोलेन. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अशी शेरेबाजी झाली असेल तर ती कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले.
solute to varsha gaikwad……