मध्य रेल्वेने बुधवारी सुट्टीसाठी एलटीटी-सावंतवाडीदरम्यान ५८ नव्या फे-यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ‘प्रहार’च्या वृत्ताची दखल घेत या गाड्यांना कोकणातल्या सर्वच महत्त्वाच्या व मोठय़ा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
मुंबई- होळी आणि उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात सोडण्यात येणा-या अतिरिक्त गाड्यांना मोजकेच थांबे देण्यात आले होते. ‘प्रहार’ने यावर प्रकाश टाकून‘गाड्या मिळाल्या पण थांबेच नाहीत’ या आशयाचे वृत्त छापले होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने बुधवारी सुट्टीसाठी एलटीटी-सावंतवाडीदरम्यान ५८ नव्या फे-यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या गाड्यांना कोकणातल्या सर्वच महत्त्वाच्या व मोठय़ा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाडय़ा दक्षिण भारतात जातात. मात्र त्यांना अनेक महत्त्वाच्या ठिकाणी थांबे नसल्याने कोकणीवासीयांना त्यांचा फायदा होत नाही. त्यामुळे अतिरिक्त व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असलेल्या गाड्यांची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. ‘प्रहार’नेही त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे यावर्षी कोकणात जाण्यासाठी अनेक गाडय़ा उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वे उन्हाळी सुट्टीसाठी नव्या ५८ फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या फे-या आठवडय़ातून मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी होणार आहेत. या गाडय़ा ४ एप्रिलपासून ७ जूनपर्यंत धावतील. एलटीटी वरून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सुटणा-या या विशेष गाडीच्या आरक्षणाला २३ मार्च पासून सुरुवात होईल.
गाडय़ा असल्या तरी कोकणातल्या स्थानकांवर थांबेच मिळत नसल्याचा मुद्दा ‘प्रहार’ने उचलून धरला होता. त्यानुसार नव्या ५८ फे-यांदरम्यान या गाडय़ा कोकणातल्या सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. त्यात ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधूदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने एलटीटी-रत्नागिरी या नव्या गाडीच्या १८ फे-यांची घोषणा केली होती. मात्र तिला मोजकेच थांबे असल्याने कोकणवासीयांना त्याचा फायदा होणार नाही, ही बाब ‘प्रहार’ने निदर्शनास आणून दिली होती.
[EPSB]
कोकण रेल्वेला गाड्या मिळाल्या, पण थांबेच नाहीत
होळी आणि सुट्टीनिमित्त कोकणात जाणा-यांसाठी कोकण रेल्वेवर जादा गाड्या सोडण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मात्र या गाड्यांना कोकण रेल्वे मार्गावर मोजकेच थांबे देण्यात आल्याने याचा त्यांना कोणताच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
[/EPSB]
१ एप्रिलपासून सहा महिने व वर्षाचा रेल्वे पास
उपनगरीय रेल्वेने प्रवास करणा-या प्रवासींना आता सहा महिन्यासोबतच वर्षभराचा पास मिळणार आहे. याची सुरुवात १ एप्रिलपासून होणार आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणेच रिफंड ही व्यवस्था असणार नाही. यापूर्वी त्रमासिक आणि मासिक पासची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे दर महिन्याला अथवा तीन महिन्यांनी पास काढावा लागत होता. मात्र आता सहा महिन्यांचा किंवा वर्षाचा पास काढल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. विद्यार्थाना मात्र मासिक आणि त्रमासिक पासच काढता येणार आहेत.
खूप छान बातमी आहे पण तीन तालुक्यात (लांजा , वैभववाडी , माणगाव ) येथे या गाडीला थांबा नाही. येथेही गाडीला थांबा दिला पाहिजे.