विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील दीक्षान्त सभागृहात मागील काही दिवसांपासून उच्च दर्जाचे वातानुकूलित सयंत्र बसवण्यात आले आहे.
मुंबई- विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील दीक्षान्त सभागृहात मागील काही दिवसांपासून उच्च दर्जाचे वातानुकूलित सयंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्रणेसाठी व त्याच्या देखभालीसाठी मुंबई महानगर गॅस लिमिटेडने एक कोटीची आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महानगर गॅसच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला परिषदेच्या सदस्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे वातानुकूलित संयत्राच्या देखभाली संदर्भात मुंबई विद्यापीठ आणि महानगर गॅसदरम्यान लवकरच सामंजस्य करार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात सर कावसजी जहांगीर यांनी दिलेल्या देणगीतून सभागृह उभारण्यात आले आहे. त्याची बांधणी १३व्या शतकातील फेंच गॉथिक शैलीतील आहे. त्याच्या उभारणीसाठी कुर्ला व पोरबंदर जातीचे दगड वापरण्यात आले आहेत. त्याचे बांधकाम १८६९ मध्ये सुरू होऊन १८७४ साली पूर्ण झाले होते. तर मुख्य सभागृह १०४ फूट लांब आणि ४४ फूट रुंद आणि ६३ फूट उंच आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भव्य कमानी असलेल्या उत्कृष्ट, गोलाकार, आणि उत्तरेकडील टोकाला १२ राशींच्या चिन्हांची चित्र दिसतात.
तिन्ही बाजूला बांधलेल्या गॅले-या अतिशय आकर्षक आणि लक्ष वेधून घेणा-या आहेत.
शैक्षणिक सभांसाठी शानदार सभागृह
विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ याच पदवीदान सभागृहात पार पडतो. अधिसभा, विद्वत सभा, अनेक शैक्षणिक उपक्रम, चर्चासत्रे, सेमिनार, महत्त्वाच्या बैठकाही येथे आयोजित केल्या जातात. मुंबई शहराचे भूषण असलेल्या पदवीदान सभागृहाला २००७ साली युनेस्कोकडून ‘आशिया पॅसिफिक हेरिटेज कन्झर्वेशन अवार्ड’ मिळाला आहे. मुंबईच्या शैक्षणिक वैभवाचे प्रतीक म्हणून सर जहांगीर कावसजी पदवीदान सभागृह आणि राजाबाई टॉवरकडे पाहिले जाते.
मुंबई विद्यापीठातील प्रत्येक विभाग हे वातानुकुलीत करण्यात यावे. कारण विद्यार्थ्यांचे निकालाचे कामकाज आणि भरपूर कोर्सेस तेथे शिकवण्यात येतात. गुणपत्रिका छापण्याची मशिने त्याही भरपूर प्रमाणात गरम होतात आणि अशा ठिकाणी साधा पंखाहि नसेल तर तेथे काम करणारा व्यक्ती वेडापिसा होईल आणि लाखो रुपयाच्या मशीनिचाही सत्यानाश होईल. निकाल लावण्याचे कामकाज हे एक जिकरीचे कामकाज आहे, गरम डोक्यामुळे निकाल उलट सुलट लागतील, म्हणून तेथील तापमान हे खूप खूप थंड असले पाहिजे. त्याच प्रमाणे तेथील कर्मचारी रात्रंदिवस काम करून निकालांची कामे पूर्ण करतात, सुट्टीच्या दिवसातही अतिरिक्त पगार घेत नाही, किमान खाण्यापिण्याची सोयही तेथे उपलब्ध करून द्यावी.