भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना विजेचा झटका देऊन मारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी महापालिका सभागृहात केली.
मुंबई – भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना विजेचा झटका देऊन मारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी महापालिका सभागृहात केली.
कुत्र्यांना मारण्यास बंदी असली, तरी महापालिकेने उत्तम वकील नेमून याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून बाजू मांडवी, अशी सूचना या वेळी महापौर सुनील प्रभू यांनी प्रशासनाला दिली. याबाबत २५ ऑगस्ट रोजी विशेष सभा बोलावून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत सुमारे ७० ते ८० हजार लोकांवर कुत्र्यांनी हल्ले केले. मनेका गांधी यांनी प्राण्यांचा हक्क व रक्षणासाठी मोहीम सुरू करून कुत्र्यांच्या बचावासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०११मध्ये भटक्या कुत्र्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या एका प्रकरणात निकाल देताना कुत्र्यांना ठार मारण्याचा कायदा न्यायालयाने मान्य केला होता.
मात्र प्राणीमित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. हा निर्णय आजही प्रलंबित आहे. कुत्र्यांना विजेचा झटका देऊन ठार मारण्याचा जो निर्णय होता, त्या प्रकरणात महापालिकेने बाजू मांडावी. यासाठी चांगले वकील नियुक्त करावेत, अशी मागणी जामसूतकर केली.
भटक्या कुत्र्यांसाठी मागील वर्षी साडेसात कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी पावणे दोन कोटी, तर त्यापूर्वी तरतूद करण्यात आलेल्या १.७२ कोटीपैकी २४ लाखांचा खर्च करण्यात आले. त्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोप जामसूतकर यांनी केला.
ज्यांना कुत्र्यांचा पुळका आहे त्यांनी रात्री रस्त्यावरून फिरून दाखवावे. हे स्वतः गाडीतून फिरतात.
ह्या भटक्या कुत्र्यांना मारू नका ! असे जो कोणी म्हणत असेल त्यांच्या घरांत जाऊन ह्या भटक्या कुत्र्यांना सोडा ,सोबत,
मुंबईतील ,घुशी,उंदीर ,मांजरे,यांचा पण नजराणा त्यांना अर्पण करा ,!!!