भारताच्या लष्करी जवानांवर भ्याड हल्ला करून पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा भारताने बुधवारी तीव्र शब्दांत निषेध केला.
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये भारताच्या लष्करी जवानांवर भ्याड हल्ला करून पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा भारताने बुधवारी तीव्र शब्दांत निषेध केला. पाकिस्तानने अशी कृत्ये थांबवली नाहीत, तर त्याचे वाईट परिणाम होतील. त्यांची ही कृत्ये निषिद्ध असून, त्यांना मूँहतोड जवाब दिला जाईल, असा सज्जड दम भारताकडून देण्यात आला आहे.
संयमी भूमिका घेत दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत, यासाठी भारतातर्फे प्रयत्न केले जात असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. सरकार व सर्व राजकीय पक्षांनी या हल्ल्यांचा निषेध केला असून, अमेरिकेनेही हा हल्ला निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सलमान बशीर यांना समन्स बजावून या हल्ल्याबाबत कानउघाडणी केली. दरम्यान, भारताचे लष्करी कारवाईविषयक महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनीही पाकिस्तानी लष्कराचे संबंधित अधिकारी मेजर जनरल अश्फाक नदीम यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या या हल्ल्याचा काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला. ‘‘पाकिस्तानने शस्त्रसंधी कराराचे काटेकोर पालन करायला हवे. जवानांची अशी विटंबना सहन केली जाणार नाही. अशा प्रकारांना वेळीच आळा बसायला हवा,’’ असे माहिती व दूरसंचारमंत्री मनीष तिवारी यांनी ‘ट्विटर’वर म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ता रशीद अल्वी यांनीसुद्धा या घटनेचा निषेध केला आहे. पाकिस्तानी सैनिकांचे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे अल्वी म्हणाले. दरम्यान, भाजपनेही पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, सरकारने याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानचे हात वर
नियंत्रणरेषेपासून १०० मीटर आत घुसून मंगळवारी पूँछ जिल्ह्यात भारतीय सैनिकांची हत्या केल्यानंतरही पाकिस्तानने असा हल्ला झाला नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी अशा प्रकारचा कोणताच हल्ला झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेपूट वाकडेच
पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीचा सर्वत्र निषेध होत असतानाच त्यांनी बुधवारीही दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पूँछमधीलच नंगीतिक्री येथील भारताच्या लष्करी छावण्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला.
पाकिस्तानात शीख नागरिकाचा शिरच्छेद
विरोधी दहशतवादी गटासाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करून मोहिंदर सिंग या पाकिस्तानच्या खैबर भागातील तब्बाई गावात राहणा-या शीख नागरिकाची मंगळवारी शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. महिनाभरापूर्वी मोहिंदर यांचे अपहरण करण्यात आले होते. ‘तव्हिदूल इस्लाम’ इस्लाम या दहशतवादी गटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
हा हल्ला अत्यंत प्रक्षोभक असून, पाकिस्तानी सैनिकांनी केलेली भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना अमानवी आहे. पाकिस्तानने कितीही इन्कार केला, तरी सत्य लपणार नाही. आमच्याकडे या हल्ल्याचे पुरावे आहेत. – ए. के. अँटनी, संरक्षणमंत्री
दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र शेजारील देशाकडूनही त्यादृष्टीने प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. या हल्ल्याविषयीची भारताची प्रतिक्रिया अतिशय कडक शब्दांत पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. – सलमान खुर्शीद, परराष्ट्रमंत्री
शहीदांच्या गावांवर शोककळा
पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक हेमराज व लान्स नाईक सुधाकर सिंह यांचे मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आले. हेमराज उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातल्या शेरनगर गावचा, तर सुधाकर मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यातील दरहिया गावचा रहिवासी होता. दोघांचेही मृतदेह तिरंग्यात गुंडाळून त्यांच्या गावी नेताच, दोन्ही गावांवर शोककळा पसरली.
[EPSB]
दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
पाकिस्तानच्या सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडून भारतात प्रवेश करुन दोन सैनिकांची हत्या केली.
[/EPSB]
आमच्या देशाचे दुर्दैव असे आहे की, आपले देशप्रेम फक्त काळया फीती लावणे, मेणबत्या लावणे इतपतच आहे. आपल्या षंढ राज्यकर्त्यांना जरा सुध्दा शरम नाही ह्या पाकड्यांबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायला, बोलवा हरामखोरांना भारतात, त्यांना विझा द्या, सिनेमामध्ये काम द्या, रहायला मुंबई सारख्या शहरात जागा सुध्दा द्या, विवीध कार्यक्रमात आपल्या देशातील दिग्गज कलावंतांच्या मांडीला मांडी लाऊन बसा, सिरिअल्स मध्ये काम करा, इथे येऊन नुसता नंगा नाच करा, हैदोस घाला, इथे तुम्हाला कोणी काही सुध्दा बोलणार नाही आणी काही सुध्दा करणार नाही. खरं तर हे सर्व देण्या घेण्याचे मुर्ख, फाजील लाड आपल्या राज्यकर्त्यांनी बंद केलेच पाहीजे. सगळ्यात कहर म्हणजे, म्हणे दोन देशात क्रिकेटचे सामने खेळण्यानी आपले संबंध सुधारतील हे जे मुर्खपणाचे, खुळ ज्यांनी कोणी काढले त्यां सर्वांना सीमेरेशेपलीकडे सोडून यावे. ते एक प्रकारे देशद्रोहीच आहेत जे पाकिस्तानमधील लोकांना आपल्या देशात बोलावून लाड करतात. आपणच ही हिरवी वळवळ्णारी कीड चिरडून काढली पाहिजे….आता बस झाले कुत्रांना पोसणे…. पिसाळलेल्या कुत्रांना वेळीच गोळ्या घातल्या पाहीजे.