राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालेगाव हा नवा जिल्हा निर्माण करण्याची मागणी केली आहे.
मालेगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालेगाव हा नवा जिल्हा निर्माण करण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंगळवारी मालेगावमध्ये झालेल्या सभेत त्यांनी ही मागणी केली.
नाशिकमधून मालेगाव जिल्ह्याची निर्मीती करुन त्याला अल्पसंख्यांक जिल्ह्याचा दर्जा द्यावा असे पवार म्हणाले. यामुळे या शहराचा विकास होईल असे त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र आता आम्ही मालेगाव जिल्ह्याच्या निर्मीतीसाठी प्रयत्न करु आणि त्याचा विकास करू असे पवारांनी सभेत सांगितले. तसेच या जिल्ह्यातून हज यात्रेकरुसाठी औरंगाबादपर्यंत विमान सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करु असे ते म्हणाले.
या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
लाज वाटते का जरा तरी पवार साहेब? मतासाठी आता गाव पण जातीवर वसवणार काय?