आंध्र प्रदेश राज्यात उष्णतेच्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. उष्माघाताने राज्यातील आतापर्यंत ५५०हून अधिक जणांचे बळी गेले आहेत.
हैदराबाद – आंध्र प्रदेश राज्यात उष्णतेच्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. उष्माघाताने राज्यातील आतापर्यंत ५५०हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. एकट्या गुंटूर जिल्ह्यात उष्माघाताने १०४ जणांचा बळी गेला.
राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. संपूर्ण आंध्र प्रदेश राज्यात वाढत्या उष्णतेमुळे ५५१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष आयुक्त तुलसी राणी यांनी दिली.
गुंटूर जिल्ह्यात १०४ जणांचा मृत्यू झाला तर पूर्व गोदावरी(९०), विझियनाग्राम(८४), विशाखापट्टणम(६१) आणि प्रकासम जिल्ह्यातील ५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विझियनाग्राम,विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, प्रकास आणि नेल्लोर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा आज कायम राहणार आहे. रविवारी राज्यातील काकिनदा, मचिलीपट्टणम, जंगमाहेस्वरुपम आणि टुनी या भागांमध्ये सर्वाधिक ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
तेथिल सरकार काय झोप काढत आहे का? सारखी मुंबई त्यांना का आणि किती मदत करणार?