मराठी व्देषातून सीमाभागातील मराठीजनांवर केलेला अमानुष लाठीमार कर्नाटक पोलिसांना भोवणार आहे.
नवी दिल्ली – मराठी व्देषातून सीमाभागातील मराठीजनांवर केलेला अमानुष लाठीमार कर्नाटक पोलिसांना भोवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या लाठीमाराची गंभीर दखल घेत, महाराष्ट्र सरकारला यासंबंधी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात समाविष्ट करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्याची शुक्रवारी सुनावणी सुरु होती. त्यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी ही अमानुष लाठीमाराची घटना न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिली.
पुराव्यादाखल या लाठीमाराची छायाचित्रेही दाखवली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर.एम.लोढा आणि न्यायमूर्ती कुरीयन जोसेफ यांनी या छायाचित्रांची गंभीर दखल घेतली व महाराष्ट्र सरकारला यासंबंधी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.
त्यामुळे आता कर्नाटक पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राला त्यांची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सहा आठवडयांची मुदत दिली आहे. बेळगावमधील मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा नामफलक काढण्यासाठी आलेल्या कर्नाटक पोलिसांना येळ्ळूरच्या ग्रामस्थांनी विरोध केला. त्यावर संतापलेल्या कानडी पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला करत अत्याचाराचा कहर केला. घरात घुसून अबालवृध्द, महिलांना बेदम मारहाण केली होती.
नालायकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे …