राज्यात १२ फेब्रुवारीला रास्ता रोको करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या सर्व पदाधिका-यांना जमावबंदीची नोटीस बजावली आहे.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १२ फेब्रुवारीला राज्यात रास्ता रोको करणार असल्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस दलाचे दखल घेतली आहे. कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईसह राज्यातील मनसेच्या सर्व पदाधिका-यांना जमावबंदीची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.
राज्यातील टोलनाक्यांविरोधात पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. तसेच १२ फेब्रुवारीला राज्यात रास्ता रोको करणार असून या आंदोलनाचे नेतृत्व आपण करणार आहोत. जोपर्यंत टोलबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि खोटे टोल नाके बंद नाहीत, तोवर हे आंदोलन सुरुच राहिल. हिंमत असल्यास सरकारने मनसेला अडवून दाखवावे आणि मला अटक करुन दाखवाच, अशी धमकीच ठाकरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जमावबंदीची नोटीस काढण्यात आली आहे.
[EPSB]
राज्यात १२ फेब्रुवारीपासून मनसेचा रास्ता रोको
राज्यातील टोलनाक्यांविरोधात पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असून, १२ फेब्रुवारीपासून राज्यात रास्ता रोको करणार असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली.
मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय पक्षाची मान्यता रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे.
[/EPSB]
i like the mns and raj thakre