हरयाणामधील अविवाहित पुरुषांची बिहारच्या तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान भाजपचे नेते ओ. पी. धनखड यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
चंदीगड – राज्यात भाजपची सत्ता आल्यास हरयाणामधील अविवाहित पुरुषांची बिहारच्या तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान हरयाणातील भाजपचे नेते ओ. पी. धनखड यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
शुक्रवारी नरवाणा येथील शेतकरी महासंमेलनात भाषण देताना भाजपचे राष्ट्रीय किसन मोर्चाचे अध्यक्ष धनखड यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. ऑक्टोबरमध्ये होणा-या निवडणुकीतनंतर जर हरयाणामध्ये भाजपची सत्ता आली तर हरयाणातील सर्व अविवाहितांची बिहारच्या तरुणींशी लग्ने लावून दिली जातील, असे ते म्हणाले होते.
हरयाणामध्ये सध्या प्रत्येक १००० पुरुषामागे ८७९ स्त्रिया इतके प्रमाण आहे. त्यामुळे तेथील अविवाहित तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
धनखड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. हा फक्त बिहारच्या नाही तर सर्व स्त्रियांचा अपमान आहे असे सांगत धनखड यांना विधानाबद्दल अटक करावी. तसेच भाजपने याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी जदयू(संयुक्त)चे नेते अली अन्वर यांनी केली आहे.
काय पण ….