डोंबिवली – गुरुवारी रात्री इमारतीला तडे गेल्याने बेघर झालेल्या ७१ कुटुंबीय निवा-याच्या शोधात होती. मात्र शिवसेनेने त्यांचा संसार उघडय़ावर पडू दिला नाही. त्यांच्या निवा-याची सोय करून देऊ असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांना दिले होते. त्यानुसार कल्याण जवळील कचोरे येथील बीएसयूपी प्रकल्पातील इमारतीत बेघर कुटुंबीयांना घरे देऊन दिलेला शब्द खरा करून दाखवला. तर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवले असून राज्य शासनाने बीएसयूपी प्रकल्पातील घरे संक्रमण शिबीर १९० दिवसांसाठी वापर करण्यास परवानगी दिली आहे.
बुधवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कुटुंबीयांना कल्याणजवळील कचोरे येथील बीएसयूपी प्रकल्पातील इमारतीत घरांच्या चाव्या दिल्या. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, माजी महापौर रमेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे, भाजप नगरसेविका मनीषा धात्रक, रेखा चौधरी, रिपाइंचे माणिक उघडे, मीना साळवे, राहुल क्षीरसागर, परिवहन समिती सभापती संजय पावशे, सदस्य मनोज चौधरी यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी युवा सेनेचे राहुल लोंढे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी शारदाबाई पवार यांना घराची चावी दिल्यानंतर उर्वरित रहिवाशांना चिठ्ठय़ा टाकून घरांचे नंबर सांगण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना या कुटुंबीयांचा संसार उघडय़ावर पडू देणार नाही. आज सकाळी मुख्यमंत्र्यांना या घटनेने गांभीर्य पटवून दिले. त्यावेळी त्यांनीही ७२ कुटुंबीयांना निवारा देण्याचे निर्देश दिले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. बीएसयूपी प्रकल्पात अशा प्रकाराच्या धोकादायक इमारती लोकांना निवा-यासाठी शासनाकडून परवानगी मिळाली पाहिजे. ठाण्याच्या धर्तीवर कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत क्लस्टर योजना राबविल्यानंतर धोकादायक इमारतीला रहिवाशांच्या राहण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही ते म्हणाले.
आम्हाला घरे मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेचे आणि भाजप नगरसेविका मनीषा धात्रक यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
– शारदाबाई पवार
As per reliable sources BJP corporator Smt. Manisha Dhatrak had played a major role and was present and made arrangement for the affected families. She ( BJP corporator Smt Manisha Dhatrak) not only made arrangement for the BSUP homes but also was present at BSUP sites to see that all were settled properly. Ambulance , Fire Brigade and other facilities were present at the time of eviction to avoid any casualty. Great work of BJP ( Corporator Smt.Manisha Dhatrak).