महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मार्च-एप्रिल २०१४ पासून सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दिली.
मुंबई- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मार्च-एप्रिल २०१४ पासून सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दिली. हे स्मारक उभारण्यास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. या स्मारकावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही लवकर मार्गी लागेल. या स्मारकाची जागा मरीन ड्राइव्ह समोरील समुद्रात निश्चित केली आहे. या स्मारकासाठी १३ विविध सर्वेक्षण सुरू आहेत. त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल. त्यासाठी तीन ते चार महिने लागतील. त्याचवेळी पर्यावरण विषयक परवानग्याही मिळवल्या जातील. या स्मारकाचे आराखडे वास्तूविशारद बनवत आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत या स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची नुकतीच आपण पाहणी केली. त्याची रचना, उभारणीची माहिती घेतली. त्याचा फायदा शिवाजी महाराजांचे स्मारक उभारताना नक्की होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
पाटील यांचा भाजपला टोला
राज्यातले काँग्रेस आघाडी सरकार कोणत्याही निवडणुका समोर ठेवून स्मारक उभारत नाही, असा टोला पालकमंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केवळ निवडणूक समोर ठेवून उभारला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. गेली दहा वर्षे मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. या कारकीर्दीत त्यांना सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभारावा असे वाटले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
kasala ugach tras kartay patilsaheb aata sarva lokanna kalun chuklay ki tumhi rajkarni babasaheb asot kinva chatrapati shivaji maharaj asot yancha fact tumchya swarthasathi vapar kart aahat,mi modi samarthak nahi pan tumhi modina jo tola lagavlay to tumhalapan lagu hoto he visru naka….tumhi pan aata nivdnukichya tondavarch ka smarkancha vishay kadhun sahanbhuti milavtay….baki prashna aahet ho maharashtrat tyanchakade man lavun dhyan dya mhanje sarkar vachvu shakal nahitar hich janata tumhala maaf karnar nahi he lakshyat theva…..