रिक्षाचालकांना पावसाळ्यात तिप्पट भाडे द्या अन्यथा रिक्षाचलकांनी रिक्षा रस्त्यावर आणू नयेत असे अजब तर्कट कामगार नेते शरद राव यांनी मांडले आहेत.
मुंबई- रिक्षाचालकांना पावसाळ्यात तिप्पट भाडे द्या अन्यथा रिक्षाचलकांनी रिक्षा रस्त्यावर आणू नयेत असे अजब तर्कट कामगार नेते शरद राव यांनी मांडले आहेत. त्यानुसार कमीत कमी भाडे ४५ रूपये मिळावे अशी अजब मागणी त्यांनी केली आहे.
[poll id=”299″]
पावसाळ्यात रिक्षांचा देखरेख खर्च वाढतो, शिवाय अनेक वेळा पावसात पाणी साचल्याने गाडया उभ्या रहातात त्यामुळे रिक्षाचालकांच्या उपजिवीकेचा प्रश्नच निर्माण होतो. त्यामुळे तिप्पट भाडेवाढ मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावर सरकारने १७ जून पर्यंत विचार करावा अन्यत: १७ जूनच्या मध्य रात्रीपासून रिक्षाचालक स्वत:हून रिक्षा रस्त्यावर उतरवणार नाही अशी धमकीच दिली आहे. सध्या रिक्षाचे कमीत कमी भाडे हे १५ रूपये आहे.
शरद राव यांनी स्वत: पजेरो गाडीतुने फिरतात आणि रिक्षाचलकांना भाडे वाढ मागतात. कमीत कमी भाडे ४५ रूपये मिळावे अशी अजब मागणी त्यांनी केली आहे. रिक्षा चालकांना उपाशी मारण्याचा कट आहे वाटत शरद रावांचा .मी प्रहार प्रतिनिधीला येथे सागणे आहे कि किती रिक्षाचालकांना भाडे वाढ हवी आहे याची माहिती घ्या आणि नंतरच शरद रावांचे वैयकतिक मत बातमी पत्रकात मांडावे
भाडे वाढ होईल, परंतु रिक्षा चालकांची अरेरावी कधी थांबणार? सर्वच्या सर्व मिटर डिजीटल केव्हा होणार? कृपया शरद रावांनी सांगण्याची कृपा करावी.
या शरद राव ला वेडचं लागलेयं बहुदा. ४५ कशाला या अरेरावी आणि मग्रुरी करणा-या रिक्षेवाल्यांना अगदी १०० रूपयेच भाववाढ द्या हो शरद राव. सर्वसामान्य नागरिक काही दुधखुळे नाहीएत हे लक्षात ठेवा. जितकं आम्हाला त्रास द्याल त्याच्या चौपटीपेक्षा जास्त बाहेर निघेल हे ध्यानात असूद्या. लोक शांत आणि गप्प आहेत तोपर्यंत ठिक आहेत. पण जर हे पब्लिक पेटलं ना तर रिक्षावाले आणि त्यांच्या रिक्षा आणि शरद राव या सर्वांनाच कायमचं बंद करून टाकेल. मागणी करताना तीचं तारतम्य ठेवा. ती संयुक्तिक आहे की नाही याचा विचार करा. आणि तुमच्या डोक्यापेक्षा काही रिक्षावाले समंजस आहेत ते प्रवाशांच्या बाजूचे आहेत आणि जी कमाई होते त्यात सुखी आहेत. महागड्या गाडीतून फिरणा-या रावांनी जरा सर्वसामान्यांसारखा प्रवास तरी करून दाखवावा. आत्मपरीक्षण करावे. त्यांच्या आवाहनाला लोकं यापुढे भिक घालणार नाही हे लक्षात ठेवावे. त्यापेक्षा इच्छित स्थळी लोक बसेस अथवा दोन पायांच्या गाडीचा मार्ग स्वीकारतील. मग यांचे रिक्षावाले देशोधडीला लागतील हे लक्षात असू द्यावे.
ya ravala akkal nahi .. kahihi baralato . kahi rikshwalehi uddam zalet , pavsala suru hounahi ajun tyani pravashi vastat tithe darvajayajaval plastic taklele nahi. o rav pahile tyana changulpana shikva